मुंबईसह देशातील ७ विमानतळावर जीपीस स्पूफिंग माध्यमातून सायबर हल्ला मंत्रिमहोदयांनी म्हटले या तांत्रिक कारणांमुळे.....

मुंबई: मुंबईसह देशातील सात विमानतळावर सायबर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जीपीस स्पूफिंग (GPS Spoofing) या नव्या तंत्रज्ञानातून एअरपोर्टमधील नेव्हिगेशन प्रणालीवर हल्ला करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांनी केला आहे. संसदेतील हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर विचारले असता त्यांनी या हल्ल्याची पुष्टी करत मात्र त्यामुळे एव्हिऐशन सिस्टिमचे कुठल्याही प्रकारचे तांत्रिक नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय या तांत्रिक कारणामुळे कुठलेही विमान उड्डाण रद्द करण्यात आलेले नसल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे तांत्रिक प्रणाली प्रतिरोधक म्हणून सक्षमतेने काम करत असली तरी देशाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर बोलताना त्यांनी अनेक प्रमुख विमानतळांवर येणाऱ्या विमानांमध्ये जीपीएस स्पूफिंगची तक्रार आल्याचे उघड केले आहे. विशेषतः दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळाच्या रनवे १० वर लँडिंग करताना ही घटना झाली असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी बोलताना अधिकृत पुष्टी केली की सायबर हल्ल्यांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरूसह इतर विमानतळांना लक्ष्य केले गेले होते, ज्यामुळे ते भारतातील सर्वात व्यापक विमान वाहतूक सायबर सुरक्षा उल्लंघनांपैकी एक अशी ही घटना घडलेली आहे. सरकार यावर आगामी काळात मोठ्या पातळीवर चौकशी करण्याची शक्यता आहे.


अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हल्लेखोरांनी विमानांच्या नेव्हिगेशन सिस्टीममध्ये अडथळा आणणारे खोटे सिग्नल सोडून जीपीएसच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. जीपीएस स्पूफिंगमुळे विमानांना त्यांच्या रिअल-टाइम स्थान, उंची आणि दिशानिर्देशाबद्दल दिशाभूल होऊ शकते ज्यामुळे लँडिंगसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये संभाव्य सुरक्षितता धोके उद्भवू शकतात. दिल्ली विमानतळावर एका मोठ्या तांत्रिक समस्येनंतर काही आठवड्यांपूर्वी सायबर हल्ल्यांची पुष्टी झाली होती.नंतरच्या तपासात असे दिसून आले की ही समस्या हॅकिंगपेक्षा ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम (AMMS) मधील बिघाडामुळे झाली होती.


त्याच वेळी, भारतीय विमान कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या एअरबस ए३२० विमानांना प्रभावित करणाऱ्या जागतिक सॉफ्टवेअर बगमुळे जवळजवळ ३८८ उड्डाणांमध्ये व्यत्यय आला होता. धोक्याची तीव्रता असूनही, सरकारने आश्वासन दिले की सायबर हल्ल्यामुळे कोणतेही उड्डाण विलंबित किंवा रद्द झाले नाही. नेव्हिगेशनल विसंगती हाताळण्यासाठी डिझाइन केलेल्या आकस्मिक प्रक्रियांद्वारे एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) प्रणाली सामान्यपणे कार्य करत राहिल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा उड्डाण वेळापत्रक गोंधळ अथवा प्रवाशांची सुरक्षा आणि विमानतळ ऑपरेशन्स यावर नकारात्मक परिणाम झालेला नाही.


GPS Spoofing म्हणजे नक्की काय?


ही एक नवी सायबर क्राईमची नवी पद्धत आहे. जीपीएस स्पूफिंग म्हणजे रिसीव्हरला खोटे जीपीएस सिग्नल प्रसारित करून त्याला चुकीची स्थिती वेग किंवा वेळ मोजण्यास भाग पाडले जाते. जीपीएस स्पूफिंग हे खऱ्या उपग्रह सिग्नलच्या अंतर्गत कमकुवतपणाचा फायदा घेत त्यांना अधिक मजबूत, बनावट सिग्नलने मात देते ज्यामुळे सायबर घोटाळेबाजांना सिस्टिमवर हल्ला करून मात करणे अधिक सोयीस्कर होते. सायबर हल्ल्याचा हा प्रकार जीपीएस जॅमिंगपेक्षा वेगळा आहे जो फक्त कायदेशीर सिग्नल ब्लॉक करतो.

Comments
Add Comment

Explainer: भाजप महायुती बीएमसी जिंकल्यास अर्थकारणावर सकारात्मक परिणाम? काय म्हणाले तज्ज्ञ वाचाच

मोहित सोमण: प्रामुख्याने आज २९ महानगरपालिकांचा निर्णय लागताना खरं तर मुंबईसह संपूर्ण देशाचे लक्ष बृहन्मुंबई

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

देशातील सर्वात १० श्रीमंत महानगरपालिका व त्यांच्या बजेटची यादी वाचा

मुंबई का किंग कौन? सर्वाधिक श्रीमंत १० महानगरपालिका मुंबई महापालिका बजेट - ७४४२७ कोटी बंगलोर -

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या