निवडणूक रणधुमाळीमध्ये बुलढाण्यात गोंधळ; बोगस मतदाराला नागरिकांकडून चोप

बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार पकडल्याची घटना समोर आली. नागरिकांनी या तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काही क्षणातच हा बोगस मतदार पोलिसांच्या हातातून निसटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.


घटनेदरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कुणाल गायकवाड हे पकडलेल्या तरुणाचा बचाव करताना, तसेच उपस्थित पोलिसांशी उध्दट वर्तन करताना दिसत आहेत. कुणाल यांनी पोलिसांना धमकावत बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता पुढे ढकलण्यात आले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेत काही तांत्रिक कारणे आणि प्रलंबित अपीलांमुळे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात