नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर


मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या २ तारखेला मतदान होऊन ३ डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपने प्रचारासाठी या निवडणुकीत आपली टीम उतरवली असून त्यांचा अंतर्गत सर्व्हे देखील आता समोर आला आहे. भाजपने केलेल्या या सर्व्हेनुसार पाहिलं तर, निवडणुकीत भाजपचे एकूण १७५ नगराध्यक्ष विजयी होतील. महायुतीत आणि निवडणुकांमध्ये भाजपच मोठा भाऊ असणार असल्याचा या सर्व्हेचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहात असल्याचं चित्र आहे.


लेटसअप या वेब पोर्टलने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांना विकासकामं आणि भरपूर निधी देण्याचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात येतंय. भाजप प्रदेशाध्यक्षासह जवळपास सगळेच मंत्री प्रत्येक नगरपालिका आणि नगरपरिषद पिंजून काढत आहेत. त्यातच आता भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला असून या निवडणुकांत भाजपच मोठा भाऊ ठरणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात भाजपचे एकट्याचे १७५ नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज आहे. राज्यात नगराध्यक्ष पदासाठी २४२ ठिकाणी भाजपचे तर ४६ ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजप सर्वाधिक जागा लढवत असल्यानं भाजपचं राज्यात मोठा भाऊ असेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.


दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्ही २०० जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात एकूण २८० जागांवर निवडणूक होणार आहे. त्यातील २४२ जागा भाजप कमळ चिन्हावर लढवत असून त्यापैकी २०० जागांवर आम्ही विजयी होऊ, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणुकांच्या प्रचाराला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे फिरतोय. त्यामुळे या निवडणुकीत देखील आम्हाला महाराष्ट्र आणि बिहार विधानसभेसारखं यश मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी