मेट्रो - ८ च्या आराखड्याला मंजुरी

मुंबई, नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार सुसाट


मुंबई : मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होत आहे. भविष्यात मुंबईमध्ये आणखी मेट्रो सुरू होणार आहेत. त्यापैकीच एक असणारा मार्ग मेट्रो लाईन ८ आहे. या मेट्रो मार्गामुळे दोन तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोणारा हा मेट्रो मार्ग असेल. या मेट्रो मार्गासाठी वेगात काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी २३ हजार कोटींच्या प्रकल्पाच्या ब्लूप्रिंटला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.


मुंबई आणि उपनगरात दररोज लाखो लोकांचा प्रवास होतो. महाराष्ट्रासह देशातून आणि विदेशातून मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्यावसायिक, पर्यटक, चित्रपट, कला, शिक्षणासह रोजगारांसाठी मुंबईमध्ये लाखो लोक येतात. वाढत्या लोकसंख्यामुळे मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात येतेय.


यावरच उपाय काढण्यासाठी मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये मेट्रोचं जाळ विकसीत केल्यास वाहतूक कोंडी सुटणार आहे. मेट्रो ८ मुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरात असणारी विमानतळे जोडली जाणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळांना जोडण्यासाठी राज्य सरकारकडून मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे.


२३ हजार कोटींचा हा नवीन प्रोजेक्ट येणाऱ्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि उपनगरातील कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देणारा ठरेल. मुंबई मेट्रोच्या नेटवर्क विस्ताराचा एक आवश्यक भाग म्हणून विमानतळ ते विमानतळ कनेक्टिव्हिटीला मान्यता देण्यात आली. लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे, पण या ठिकाणी सध्या वाहतूक सुविधा उपलब्ध नाहीत. या मेट्रो प्रजोक्टचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. दोन विमानतळातील अंतर फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे.


सध्या या प्रवासासाठी १२० मिनिटांचा वेळ लागतो. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे पहिल्यांदाच मेट्रोने जोडली जाणार आहेत. मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास अतिशय वेगात होणार आहे. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सोय होईल.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली