मेट्रो - ८ च्या आराखड्याला मंजुरी

मुंबई, नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार सुसाट


मुंबई : मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होत आहे. भविष्यात मुंबईमध्ये आणखी मेट्रो सुरू होणार आहेत. त्यापैकीच एक असणारा मार्ग मेट्रो लाईन ८ आहे. या मेट्रो मार्गामुळे दोन तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोणारा हा मेट्रो मार्ग असेल. या मेट्रो मार्गासाठी वेगात काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी २३ हजार कोटींच्या प्रकल्पाच्या ब्लूप्रिंटला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.


मुंबई आणि उपनगरात दररोज लाखो लोकांचा प्रवास होतो. महाराष्ट्रासह देशातून आणि विदेशातून मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्यावसायिक, पर्यटक, चित्रपट, कला, शिक्षणासह रोजगारांसाठी मुंबईमध्ये लाखो लोक येतात. वाढत्या लोकसंख्यामुळे मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात येतेय.


यावरच उपाय काढण्यासाठी मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये मेट्रोचं जाळ विकसीत केल्यास वाहतूक कोंडी सुटणार आहे. मेट्रो ८ मुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरात असणारी विमानतळे जोडली जाणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळांना जोडण्यासाठी राज्य सरकारकडून मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे.


२३ हजार कोटींचा हा नवीन प्रोजेक्ट येणाऱ्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि उपनगरातील कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देणारा ठरेल. मुंबई मेट्रोच्या नेटवर्क विस्ताराचा एक आवश्यक भाग म्हणून विमानतळ ते विमानतळ कनेक्टिव्हिटीला मान्यता देण्यात आली. लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे, पण या ठिकाणी सध्या वाहतूक सुविधा उपलब्ध नाहीत. या मेट्रो प्रजोक्टचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. दोन विमानतळातील अंतर फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे.


सध्या या प्रवासासाठी १२० मिनिटांचा वेळ लागतो. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे पहिल्यांदाच मेट्रोने जोडली जाणार आहेत. मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास अतिशय वेगात होणार आहे. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सोय होईल.

Comments
Add Comment

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच