मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीबाबत एक मोठं वक्तव्य राहुलने केले आहे. ज्याबद्दल चर्चांना जोर आला आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही भारताचे नेतृत्व केले असताना गौतम गंभीरने त्यांना कसोटी क्रिकेटपासून लांब ठेवले आहे. त्यामुळे आता फक्त वनडे क्रिकेट खेळणे हे त्यांच्या हातात आहे. तरीसुद्धा विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सातत्याने दमदार कामगिरी करत आहेत. गेल्या सामन्यात रोहित आणि विराट यांनीच भारताला सहजपणे विजय मिळवून दिला होता. आजच्या वनडे सामन्यात जर विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नसते तर भारताचे काय झाले असते, याचा विचारही न केलेला बरा असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना संपल्यावर भारताचा हंगामी कर्णधार केएल राहुलने या दोघांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
केएल राहुल सामना संपल्यावर म्हणाला की, "रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकत्र क्रिकेट खेळताना पाहणे ही एक मेजवानी असते. मी यापूर्वी काही वेळा त्यांना एकत्र खेळताना पाहिले आहे. पण आजही त्यांना जेव्हा एकत्र फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा नजर त्यांच्यावरून हटत नाहीत. दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे कधी नेमकं काय करायचं, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा जेव्हा खेळत असतात तेव्हा समोरचे प्रतिस्पर्धी किती मुर्ख वाटतात. कारण रोहित आणि कोहली दाखवून देतात की, ते नेमके कोण आहेत, त्यांनी केवढं मोठं स्थान मिळवलं आहे. ड्रेसिंग रुममध्येही जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा त्यांचं वागण आनंद देणारं असतं."
मुंबई:'हेवी डिपॉझिट'च्या नावाखाली फसवणुक करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ विशेषत: मुंबईमध्ये झाल्याचे दिसते. मुदत संपल्यावर अनामत ...
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला. यामुळे मालिकेत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराट आणि रोहीतसह हर्षित राणानेही चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला त्याने चांगल्या विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवनेही नेहमीप्रमाणे च त्याचे काम चोख बजावले आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजीही मोलाची ठरली.






