येत्या तीन वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही


मुंबई : येत्या ३ वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासाची ब्लू प्रिंट सांगितली. ते म्हणाले पुढील पाच वर्षांमध्ये बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल. मेट्रो-१४ च्या कामासाठी १८ हजार कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो पाचही बदलापूरपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी फडणवीस यांनी बदलापूरकरांना दिला.


बदलापूर - कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. मुंबई लोकल ट्रेनला मेट्रो सारखे कोच लावणार आहोत. मेट्रोसारखे दरवाजे आणि एसी लोकल असेल. त्यात कोणतीही दरवाढ करणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. कांजूरमार्ग- बदलापूर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो ठाण्यातील इतर मेट्रो मार्गाला जोडण्याचा प्लॅन सरकारने केला आहे. ४५ किमीचा मार्ग पुढील ४ वर्षांत मार्गी लागेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी, एलबीएस मार्ग, चिकोली, शीळ फाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर या स्थानकांचा या मार्गावर समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. कांजूरमार्ग ते घणसोलीपर्यंत भूमिगत, नंतर बदलापूरपर्यंत उन्नत असा मार्ग असेल, असेही सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाला १८ हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.


बदलापूर - कांजूरमार्ग या मार्गावर मेट्रो झाल्यास लोकल मार्गावरील गर्दीवर नियंत्रण येणार आहे. सर्वसामान्यांना गारेगार प्रवास करता येईल. त्याशिवाय मुंबई आणि बदलापूर या दोन शहरातील अंतर अतिशय कमी होईल. कमी खर्चात आलिशान प्रवासाची सोय होणार आहे. बदलापूरहून दररोज हजारो लोक मुंबईमध्ये कामासाठी येतात, त्यांना लोकलच्या गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यात मर्यादित लोकल असल्याने वेळेचे गणितही कोलमडले. पण मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर बदलापूरकरांचा प्रवास आरामदायी तर होणार आहेच. त्याशिवाय गर्दीतून सुटका होणार आहे.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.