कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कणकवली बाजारपेठेत प्रचार रॅली काढण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पटकी देवी ते पटवर्धन चौक अशी उत्साहात प्रचार रॅली झाली. या रॅलीला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक मान्यवरांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. घोषणा आणि पक्षाच्या घोषणांनी वातावरणात उत्साह संचारला होता. भाजपने कणकवली शहरातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी प्रचार रॅली काढली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, समीर नलावडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माताकी जय अशी घोषणाबाजी करत रॅलीत सहभागी झालेल्यांनी परिसर दणाणून सोडला. भाजपच्या प्रचार रॅलीत कार्यकर्ते आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.





पटकीदेवी येथून रॅलीला शुभारंभ झाला. रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १७ मधील राष्टÑवादीचे उमेदवार अबिद नाईक, माजी उपनगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक १३ चे उमेदवार बंडू हर्णे, भाजपचे कणकवली विधासभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उमेदवार राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, स्वप्नील राणे, माधवी मुरकर, मेघा गांगण, सावी मुंज, सुप्रिया नलावडे, गौतम खुडकर, आर्या राणे, मेघा सावंत, मयुरी चव्हाण, मनस्वी ठाणेकर, अण्णा कोदे, विश्वजित रासम, संजय कामतेकर, राजश्री धुमाळे, विशाल कामत, राजू गवाणकर, भरत उबाळे, संदीप नलावडे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पटकी देवी येथून सुरू झालेल्या रॅलीची आप्पासाहेब पटवर्धन चौक सांगता झाली. रॅली दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यापारी व नागरिकांची संवाद साधला.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे