टोरेसनंतर 'वन क्लिक मल्टिट्रेड' कंपनीचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार


मुंबई: टोरेस घोटाळ्यापाठोपाठ दादरमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. विविध ऑफर्सच्या नावाखाली सुरू असलेल्या या घोटाळ्यात सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. 'वन क्लिक मल्टिट्रेड' नावाच्या संस्थेने केलेल्या या घोटाळ्यातील फसवणुकीच्या रकमेचा आकडा सुमारे सव्वाचार कोटींपर्यंतचा आहे. या प्रकरणात संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले व सहकारी अलका दीपक महाडिक यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेतील दोन्ही आरोपी गुंतवणूक दारांचे पैसे घेऊन पसार झाले आहेत.



वडाळा परिसरात राहणाऱ्या मधुरा महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची सहकारी अलका हीने तक्रारदार मधुरा यांच्या घरी येऊन 'वन क्लिक मल्टिट्रेड' या योजनेची माहिती दिली होती. दर महिना हजार रुपये अशी रक्कम वीस महिने गुंतविल्यानंतर एकविसाव्या महिन्यांत पंचवीस हजार परतावा आणि महिन्याच्या १६ तारखेला लकी ड्रॉ या ऑफरला बळी पडून मधुरा यांनी योजनेत गुंतवणूक केली. सुरुवातीला सर्व देयके एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत मिळत होती. त्यानंतर पैसे मिळण्यास बंद झाले. पैसा मिळत नसल्यामुळे चौकशी केल्यावर नवले यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये अडकले असल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र काही दिवसांतच दादर येथील कार्यालयाला टाळे लागल्याचे समोर आले.



तक्रारदार मधुरा भोळेच्या अंतर्गत ८२ सदस्यांनी आठ लाख एकोणावीस हजार रुपये भरले. ज्यातील केवळ २५ हजार रुपये परतावा मिळाला. मधुरा यांच्या ओळखीतून गुंतवणूक केलेल्या ३२ जणांनी या ऑफर्ससाठी अजून गुंतवणूकदारांची साखळी तयार केली. अशाप्रकारे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम अशी सुमारे चार कोटी एकेचाळीस लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन फसवणूकीची मालिका सुरू ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, भोईवाडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) नितिन महाडिक या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.


Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,