श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि विनाशकारी भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत ३१ जणांना मृत्यू झाला आहे. तर, अजूनही १४ जण बेपत्ता आहे. या आपत्तीमुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.

सर्वाधिक १८ मृत्यू एकट्या मध्यवर्ती डोंगराळ भागात झाले आहेत. अडाडेराना न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १० लोक जखमी झाले असून, अजूनही १४ जण बेपत्ता आहेत. एका थरारक घटनेत, कुंबुक्काना येथे एक प्रवासी बस वाढत्या पाण्यात अडकली होती. मात्र, आपत्कालीन पथकांनी तत्परता दाखवत बसमधील २३ प्रवाशांना वाचवले, अशी माहिती डेली मिरर ऑनलाइनने दिली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत कार्याचे नियोजन करण्यासाठी अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. देशातील एकूण २५ पैकी १७ प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या आग्नेय भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता खोल दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या बट्टीकोलोआपासून २१० किलोमीटर आग्नेयेस स्थित आहे आणि तो पुढील १२ तासांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Bangladesh : हादीच्या हत्येवरून भारत-बांगलादेशात 'राजनैतिक' ठिणगी; बांगलादेशच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर

ढाका : बांगलादेशातील २०२४ च्या ऐतिहासिक विद्यार्थी उठावाचे नेतृत्व करणारे आणि 'इंकलाब मंच'चे प्रवक्ते शरीफ

Bangladesh Journalist Targeted : २८ पत्रकार, ९ वा मजला अन् गच्चीवर मृत्यूचं तांडव! दंगलखोर दरवाजा ठोकत होते, 'द डेली स्टार'मधील थरार...

ढाका : बांगलादेशातील विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराने आता अत्यंत

Osman Hadi : हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून ओढून आणा, अन्यथा देश ठप्प करू!" इंकलाब मंचाची धमकी, भारत-बांगलादेश संबंधांमध्ये पुन्हा तणावाचे सावट?

ढाका : बांगलादेशातील सत्तापालटाचा चेहरा आणि विद्यार्थी चळवळीचा अग्रगण्य नेता शरीफ उस्मान हादी याची

बांगलादेशात हिंसाचार उफाळला! इन्कलाब मंचचे प्रवक्ते हादी यांच्या मृत्यूमुळे देशाला दंगलीचे स्वरूप

बांगलादेश: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करणाऱ्या युवा चळवळीतील प्रमुख नेत्याच्या मृत्यूनंतर

पाकिस्तानातही 'धुरंधर'ची भुरळ! गेल्या २० वर्षांत सर्वाधिक पायरेटेड करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा

कराची: अक्षय खन्ना, रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि सौम्या टंडन अशा तगड्या कलाकारांची फळी असलेला

सौदी अरेबियाने हाकलून दिले ५६ हजार पाकिस्तानी भिकारी

रियाध : तेलाच्या विहिरी तसेच मक्का आणि मदिना यामुळे इस्लाम धर्मियांमध्ये प्रचंड महत्त्व