गौरवशाली क्षण! युनेस्कोच्या मुख्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई: संविधान दिनानिमित्त पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा महाराष्ट्र सरकारकडून युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट देण्यात आला होता. ज्या व्यक्तीने संविधान तयार करण्यात मोलाची कामगिरी केली त्यांच्या पुतळ्याचे अनावरण संविधान दिनानिमित्त होणं, हे खूप गौरवास्पद गोष्ट आहे. युनेस्कोच्या मुख्यालयात भारताच्या महानायकाचा अर्धाकृती पुतळा स्थापित होणे हे केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक गोष्ट आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण या उल्लेखनीय घटनेचे साक्षीदार झालो, अशा शब्दात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेचे कौतुक केले आहे. तर 'हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या संबंधित सर्व पदाधिकारी, वरिष्ठाधिकारी यांचे आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता-बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली' असे या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.




युनेस्कोच्या मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. याप्रसंगी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर केले आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठातही डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आहे. आता मुंबईतील इंदुमिल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार