धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी मुंबईतील ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. तरीही मुंबई महानगरपालिकेडून जारी वायू प्रदूषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजणारे संयंत्र अविरतपणे सुरू राहतील हे सुनिश्चित करावे. ही संयंत्रे बंद आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात वायू प्रदूषणात वाढ निदर्शनास आल्यानंतर वायू प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी या पथकाच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागातील सिद्धार्थ नगर परिसरातील १७, ‘ई’ विभागातील भायखळा, माझगाव परिसरातील ५, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील ३१ बांधकामांचा समावेश आहे

दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी संवेदक अर्थात सेन्सॉर आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणाऱ्या संयंत्रांच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मंगळवारी २७ नोव्हेंबर २०२५ आढावा घेतला. मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी ६६२ संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारे संयंत्र बसविण्यात आले आहेत. तर, २५१ संयंत्र प्रस्थापित करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. एकूण ४०० संयंत्रे ही एकत्रित माहिती संकलनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डशी संलंग्नित करण्यात आली आहेत. यापैकी, ११७ संयंत्रे सक्रिय नसल्याचे अर्थात बंद असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावल्या जात असून त्यानंतरही याठिकाणची संयंत्र सक्रिय नसल्याचे आढळून आल्यास विभाग (वॉर्ड) स्तरावर नेमण्यात आलेल्या एकूण ९५ भरारी पथकांच्या माध्यमांतून संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे .

मुंबईतील २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर

बेकरी हेसुद्धा वायू प्रदूषणास कारक घटकांपैकी एक आहेत. मुंबईतील एकूण ५९३ बेकरींपैकी २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या होत्या. महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ५७ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. तर, मागील सहा महिन्यात ७५ बेकऱ्यांनी या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच, ८८ बेकऱ्यांनी महानगर गॅस मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
Comments

लक्ष्मण कोळी    November 28, 2025 01:06 AM

महालक्ष्मी रेसकोर्स गेट नंबर 4, च्या समग्र विकासक मेसर्स,25, डाउन टाउन कंपनी च्या जोर दार काम चालू आहे, तसेज धुळ मीटी उडत आहे ? त्यामुळे रहीवाशीयाला लहान मुले बाळ वहीसकर लोकाना फार त्रास होत आहे ? आपण महानगर पालिका चे अधिकारी एक वेळा येउन बघा लोकाना कीती त्रास होतो, धन्यवाद महानगर पालिका अध्यक्ष साहेब

Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता