महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके


मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणाकरीता व्याकरणाची गरज आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुलांचे भाषेचे व्याकरण चांगले व्हावे याकरता आता इयत्ता ५वी व इयत्ता ८वी च्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरीता व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा ०८ विविध माध्यमाच्या १०४८ प्राथमिक तसेच १४७ माध्यमिक शाळा अशा एकूण ११९५ शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांमधून शिकत असणा-या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षित शिक्षक, अन्य मनुष्यबळाची तसेच शालेय इमारती, डेस्क-बेंच, फळे, शारीरिक शिक्षण साहित्य अशा भौतिक साधन सामग्रीची व्यवस्था महानगरपालिका करत असते. याशिवाय शैक्षणिक पुस्तके, अतिरिक्त अवांतर वाचनासाठी वाचनालयाची पुस्तके, नियत कालिके, ई-पुस्तके, डिजीटल कंटेंट इत्यादीही पुरविली जातात.


शासनाच्या स्तरावरस्तरावरून शैक्षणिक धोरण व शालेय अभ्यासक्रम ठरवले जात असल्याने त्याअनुषंगाने अध्ययन-अध्यापन साहित्य उपलब्धही करुन देण्यात येते. त्यानुसार विषयनिहाय अभ्यासक्रम आणि त्यास अनुसुरुन पाठ्यपुस्तिका उपलब्ध करुन दिल्या जातात. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी चालू अर्थसंकल्पिय भाषणांत 'महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे भाषेच्या लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणाकरीता व्याकरणाची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता ५वी व इयत्ता ८वी च्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरीता व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्याचे जाहिर केले. त्यानुसार आता , महानगरपालिका शाळांतील सर्व माध्यमाच्या इयत्ता ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याकरण पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


यासाठी सुदेव एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी या चार भाषेच्या व्याकरणाची पुस्तके इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्रूा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या व्याकरणाच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी ५ कोटी ६९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील