पंकजा मुंडेंच्या पीएला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएला अनंत गर्जेला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे. याआधी मुंबई पोलिसांनी गौरी पालवे गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवला. यानंतर संशयित आरोपी म्हणून अनंत गर्जेला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर अनंत गर्जेला न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी अनंत गर्जेला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर आरोपी अनंत गर्जेला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.


मुंबईत केईएमच्या डेंटिस्ट विभागात कार्यरत असलेल्या डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. या वादामुळेच मानसिक ताण वाढत गेला. ज्या दिवशी अनंत गर्जे आणि अन्य महिलेचे चॅट बघितले त्यानंतर तर संबंध आणखी विकोपाला गेले. या सगळ्यातून आलेल्या नैराश्यामुळेच गौरी यांनी गळफास लावून घेतला आणि वरळीच्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनंत गर्जे, त्याचा भाऊ आणि बहीण या तीन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


गौरीने आत्महत्या केलेली नाही तिची हत्या झाली. या हत्येला अनंत गर्जे आणि त्याचे नातलगच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप गौरीच्या आई-वडिलांनी केला आहे.

Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Assembly Election : बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

पुणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ पैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली