सरकारी निधी बाबतच्या वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत ?

नाशिक: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या २ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष प्रचार करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार मतदान तोंडावर असताना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.


बारामती तालुक्यातील मालेगाव नगर पंचायत निवडणुकीमध्ये पक्षाचा प्रचार करताना अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करताना, 'तुमच्याकडे मत आहे, तर माझ्याकडे निधी आहे' असे विधान केले. पुढे जर तुम्ही पक्षाचे सर्व उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला शब्द देतो, शहराला निधीची कमतरता भासू देणार नाही. जर तुम्ही आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार विजयी केले तर मी सर्व आश्वासने पूर्ण करेल. पण जर निवडून आले नाहीत तर मी पण विचार करेन असे अजित पवार यांनी म्हटले आहे. या भागात पवारांनी १८ उमेदवार उभे केले आहेत.



दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शिउबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सरकारला जो पैसा मिळतो तो जनतेच्या टॅक्समधून मिळतो, हा पैसा अजित पवार यांच्या घरातून येत नाही. अजित पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे मतदारांना धमकावण्याचा प्रकार आहे, हे लोकशाही विरोधात आहे, निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार? असा थेट सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


अजित पवार आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. जानेवारी २०२५ मध्ये, बारामती या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करताना सुद्धा केलेले त्यांचे विधान चर्चेत होते. "तुम्ही मला मतदान केले आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझे मालक आहात," या विधानावरून अजित पवारांवर टीका होतं होती. आता परत त्यांनी मतदारांना आवाहन करताना केलेले विधान चर्चेत आहे.

Comments
Add Comment

Raghav Chaddha : राघव चड्ढा यांच्यासह ‘आप‘च्या 'त्या' ७ खासदारांच्या भाजपमधील विलीनीकरणास मंजुरी

- उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली मंजुरी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभेतील आपले स्थान आणखी मजबूत

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो