भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला अंध महिला टी२० वर्ल्ड कप २०२५ जिंकला. त्यानंतर आता कबड्डीमध्ये भारतीय महिलांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने सोमवारी (२४ नोव्हेंबर) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

ढाकामध्ये झालेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनी तैपेई संघाला पराभूत केले. भारताने चीनी तैपेई संघाला ३५-२८ अशा फरकाने मात देत वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारतीय महिला संघाच्या या विजयानंतर सध्या त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली होती. सुरुवातीला चीनी तैपेईने भारताच्या बचावाला आव्हान दिले होते. पण भारतीय बचावपटूंनी चांगले टॅकल केले. तसेच चढाईपटूंनीही मोक्याच्या क्षणी पाँइंट्स मिळवले.

पहिल्या हाफमध्ये सामना चुरशीचा सुरू असतानाच शेवटचे काही क्षण उरले असताना संजू देवीने केलेल्या सुपर रेडने सामन्याला कलाटणी दिली. भारताने तिथून मिळवलेली लय कायम ठेवली. त्यामुळे भारतीय महिला संघाला विजेतेपद जिंकणे सहज सोपे गेले. मात्र या सामन्यात भारताची कर्णधार रितू नेगी टॅकल करताना दुखापतग्रस्त झाली होती. पण भारतीय संघाने हार न मानता तिच्या अनुपस्थिततही उर्वरित सामन्यात चांगला खेळ केला.

भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित
या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. भारताने साखळी फेरीतही चारही सामने जिंकले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत इराणला ३३-२१ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामना गाठला होता. चीनी तैपेई संघाने उपांत्य फेरीत यजमान बांगलादेश संघाला २५-१८ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. दरम्यान भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकून या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाचे हे २०२५ वर्षातील तिसरे मोठे विजेतेपद आहे. भारतीय संघाने मार्चमध्ये आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धाही जिंकली होती.
Comments
Add Comment

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय