भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला अंध महिला टी२० वर्ल्ड कप २०२५ जिंकला. त्यानंतर आता कबड्डीमध्ये भारतीय महिलांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने सोमवारी (२४ नोव्हेंबर) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

ढाकामध्ये झालेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनी तैपेई संघाला पराभूत केले. भारताने चीनी तैपेई संघाला ३५-२८ अशा फरकाने मात देत वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारतीय महिला संघाच्या या विजयानंतर सध्या त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली होती. सुरुवातीला चीनी तैपेईने भारताच्या बचावाला आव्हान दिले होते. पण भारतीय बचावपटूंनी चांगले टॅकल केले. तसेच चढाईपटूंनीही मोक्याच्या क्षणी पाँइंट्स मिळवले.

पहिल्या हाफमध्ये सामना चुरशीचा सुरू असतानाच शेवटचे काही क्षण उरले असताना संजू देवीने केलेल्या सुपर रेडने सामन्याला कलाटणी दिली. भारताने तिथून मिळवलेली लय कायम ठेवली. त्यामुळे भारतीय महिला संघाला विजेतेपद जिंकणे सहज सोपे गेले. मात्र या सामन्यात भारताची कर्णधार रितू नेगी टॅकल करताना दुखापतग्रस्त झाली होती. पण भारतीय संघाने हार न मानता तिच्या अनुपस्थिततही उर्वरित सामन्यात चांगला खेळ केला.

भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित
या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. भारताने साखळी फेरीतही चारही सामने जिंकले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत इराणला ३३-२१ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामना गाठला होता. चीनी तैपेई संघाने उपांत्य फेरीत यजमान बांगलादेश संघाला २५-१८ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. दरम्यान भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकून या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाचे हे २०२५ वर्षातील तिसरे मोठे विजेतेपद आहे. भारतीय संघाने मार्चमध्ये आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धाही जिंकली होती.
Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी