भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला अंध महिला टी२० वर्ल्ड कप २०२५ जिंकला. त्यानंतर आता कबड्डीमध्ये भारतीय महिलांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने सोमवारी (२४ नोव्हेंबर) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

ढाकामध्ये झालेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनी तैपेई संघाला पराभूत केले. भारताने चीनी तैपेई संघाला ३५-२८ अशा फरकाने मात देत वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारतीय महिला संघाच्या या विजयानंतर सध्या त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली होती. सुरुवातीला चीनी तैपेईने भारताच्या बचावाला आव्हान दिले होते. पण भारतीय बचावपटूंनी चांगले टॅकल केले. तसेच चढाईपटूंनीही मोक्याच्या क्षणी पाँइंट्स मिळवले.

पहिल्या हाफमध्ये सामना चुरशीचा सुरू असतानाच शेवटचे काही क्षण उरले असताना संजू देवीने केलेल्या सुपर रेडने सामन्याला कलाटणी दिली. भारताने तिथून मिळवलेली लय कायम ठेवली. त्यामुळे भारतीय महिला संघाला विजेतेपद जिंकणे सहज सोपे गेले. मात्र या सामन्यात भारताची कर्णधार रितू नेगी टॅकल करताना दुखापतग्रस्त झाली होती. पण भारतीय संघाने हार न मानता तिच्या अनुपस्थिततही उर्वरित सामन्यात चांगला खेळ केला.

भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित
या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. भारताने साखळी फेरीतही चारही सामने जिंकले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत इराणला ३३-२१ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामना गाठला होता. चीनी तैपेई संघाने उपांत्य फेरीत यजमान बांगलादेश संघाला २५-१८ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. दरम्यान भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकून या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाचे हे २०२५ वर्षातील तिसरे मोठे विजेतेपद आहे. भारतीय संघाने मार्चमध्ये आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धाही जिंकली होती.
Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए