एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात, मात्र शुभमन आणि श्रेयस संघातून बाहेर! केएल राहुल होणार संघाचा कॅप्टन ?

मुंबई: येत्या ३० नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र एकदिवसीय मालिकेच्या आधी सुरू असणाऱ्या कसोटी सामन्यातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मानेला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात तो दिसला नाही. मात्र आगामी एकदिवसीय मालिकेमध्येही शुभमान दिसणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर हा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने निवड समितीसमोर पेच निर्माण झाला होता.



कोण करणार भारतीय संघाचे नेतृत्व?
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्या गैरहजेरीत राहुलला 'कॅप्टन' म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. राहुलने यापूर्वीही भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्याची एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी देखील प्रभावी आहे. त्यामुळे केएल राहुल हे महत्त्वाचे नाव चर्चत आहे.



केएल राहुलने आतापर्यंत ८८ सामन्यांत ४८.३१ च्या सरासरीने तीन हजार ब्याण्णव धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कठीण दौऱ्यात राहुलचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे या मालिकेद्वारे पुनरागमन होत आहे. दक्षिण अफ्रिकाविरुद्धची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरला रांची येथे पहिल्या सामन्याने सुरू होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला रायपूर आणि ६ डिसेंबरला विझाग येथे सामने खेळवले जातील.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी