स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची मोठी तयारी; मराठवाड्यात अनुभवी नेत्यांना प्रमुख भूमिका

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना (शिंदे गट) संघटनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनुभवी आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या बदलांमधून पक्षाने निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत संघटना मजबुतीकडे स्पष्ट वाटचाल सुरू केल्याचे दिसते.


मुंबईत पक्षाने केलेल्या या नव्या घोषणेनुसार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत महत्त्वाची जबाबदारी अनुभवी नेत्यांना सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नियुक्त संपर्कप्रमुखांना निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संबंधित जिल्ह्यात राहून पक्षाची मोहीम मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.


शिवसेना सचिव संजय मोरे यांनी राज्यातील एकूण 40 जिल्हा संपर्कप्रमुखांची यादी शनिवारी जाहीर केली. नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये संघटना बळकट करण्यासाठी आमदार आणि खासदार यांचा थेट सहभाग असणार आहे.


नवीन नियुक्त्या पुढीलप्रमाणे:


छत्रपती संभाजीनगर महानगर – विलास पारकर
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकर
बीड – टी. पी. मुंडे, मनोज शिंदे
धाराशिव – राजन साळवी
नांदेड – सिद्धराम मेहत्रे
लातूर – किशोर दराडे
परभणी – आनंद जाधव
हिंगोली – हेमंत पाटील


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात अनेक बदल होताना दिसत आहेत. पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद निर्माण झाला. फक्त वादच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट अमित शाह यांच्या भेटीला या मुद्द्यावरून पोहोचले. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी त्यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी दाखवत आपली नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Petrol-Diesel : कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे

Modi : मोदी सरकारने केलेल्या ३ सुधारणांमुळे ८० कोटी रेशनधारकांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला ८० कोटी लोकांना अन्नधान्याचा

कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमित शाह घेणार मोठे निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांद्याची १,५८० रुपये दराने खरेदी; दोन ते दहा लाख टन कांद्याची अतिरिक्त खरेदी इथेनॉल कोटा वाढ, ऊस एमएसपी

Onion, sugarcane : ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा नवी दिल्ली : साखरेच्या किमान

विधानपरिषदेचे जागावाटप मुंबईतच अंतिम होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुण्याचा तिढा कायम मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष

महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या सर्व जागा लढवणार

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा; दोन दिवसांत जागावाटप अंतिम करणार मुंबई : राज्यातील