तळेगाव दाभाडेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत राडा; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

मावळ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. याच वेळी नगरपरिषद कार्यालयात अनपेक्षितरित्या तणाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, मात्र शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण दिसून आले.


तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असली तरी भाजप–राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. नेतृत्वपातळीवर दोन्ही पक्षांनी युती कायम ठेवली असली तरी स्थानिक पातळीवर उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे नाराजीत भर पडली आहे.


?si=FnJGJMqlu3fqAja4

तळेगावमध्ये तब्बल १९ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यात राष्ट्रवादीचे १० आणि भाजपचे ९ उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणुकीनंतरही उर्वरित जागांवर तणाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे.


अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेली धक्काबुक्की ही किरकोळ चकमक नसून युतीतील विसंवाद आणखी वाढत असल्याचा इशारा असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचेही समजते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने परिस्थिती बिघडली नाही, परंतु पुढील टप्प्यांत हा अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होतो का, की समन्वय साधून महायुती निवडणुकीत एकत्रितपणे लढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Sharad Pawar And Praful Patel : प्रफुल पटेल अन् शरद पवारांची 'सिल्व्हर ओक'वर गुप्तभेट?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गोटात सध्या अंतर्गत नाराजीनाट्य पेटलेले असतानाच, राजकीय वर्तुळाला

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत ठाणे : देशातील

Uday Samant : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश - उदय सामंत

मुंबई : माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा