कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बांधकाम व्यवसाय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्यांना धमकावणे, त्यांच्याकडे खंडणी मागणे अथवा त्यांचे अपहरण करुन सुटकेच्या बदल्यात पैसे मागणे हे प्रकार वाढू लागले आहेत. ताजी घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. मुंबईच्या कांदिवलीत चारकोप परिसरात भरदिवसा फ्रेंडी दिलीमा भाई नावाच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताने फ्रेंडी दिलीमा भाईवर तीन राऊंड फायर केले. गोळीबारात फ्रेंडी दिलीमा भाई गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शेतात पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली.


कांदिवलीच्या चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार झाला. दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या. जखमी झालेल्या फ्रेंडी दिलीमा भाईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार करुन फरार झालेल्यांना अवघ्या काही दिवसांत शोधून काढले. गोळीबाराची घटना १९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली आणि पोलिसांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतात पाठलाग करुन चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केली आहेत.


मुंबईतील कांदिवलीत राहणारा राजेश रमेश चौहान उर्फ दया (४२), पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये राहणारा सुभाष भिकाजी मोहिते (४४), पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राहणारा मंगेश एकनाथ चौधरी (४०) आणि ठाणे जिल्ह्यातील काशीगावमध्ये राहणारा कृष्णा उर्फ रोशन बसंतकुमार सिंह (२५) या चौघांना पोलिसांनी कांदिवलीच्या चारकोप परिसरात फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या 'कोल्हापुरी'चा डंका सातासमुद्रापार; डिझाइन आणि मार्केटिंगसाठी 'प्राडा' मदत करणार

नागपूर : पायाला भिडणारी पण जगभरात रुबाबदार समजली जाणारी महाराष्ट्राची 'कोल्हापुरी चप्पल' आता आंतरराष्ट्रीय फॅशन

महाराष्ट्राचे आणखी एक ऐतिहासिक पाऊल- गुन्हेगारांना आता एआय मार्फत पकडणार ! सायबर क्राईम तपासात एआय वापरणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य

मुंबई: महाराष्ट्राने आणखी एक ऐतिहासिक पाऊल रचले आहे. पोलिस यंत्रणेला गुन्ह्यांच्या तपासासाठी ए आय तंत्रज्ञान

महायुतीमुळे आरक्षणाचा पेच सुटला, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारने आरक्षणाचा पेच सोडवला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची अनेक वर्षांपासूनची

धक्कादायक! इंडिगोसमोर आणखी २ 'शुक्लकाष्ठ' कंपनीवर ५८ कोटींचा दंड व भुर्दंड, सीसीआय देखील चौकशीसाठी मैदानात

मोहित सोमण: इंडिगो विमान कंपनी (Interglobe Aviation Limited) कंपनी आणखी अडचणीत अडकली आहे. दोन कारणांमुळे पुन्हा एकदा कंपनी चर्चेत

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मायक्रोसॉफ्टसोबत १७ अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार; आशियातील सर्वात मोठा 'GCC' प्रकल्प महाराष्ट्रात

नागपूर : महाराष्ट्र हे गुंतवणुकीच्या बाबतीत देशात एक नंबरचे राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याचे