शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

नवी दिल्ली : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील डॉ. शाहिन सईद आणि डॉ. मुझम्मिल यांनी ‘एनआयए’समोर चौकशीदरम्यान दिला. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), जम्मू-काश्मीर पोलीस, दिल्ली गुन्हे शाखा, हरियाणा एटीएस अशा अनेक पथकांकडून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातून चालवल्या जाणाऱ्या ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ची चौकशी करण्यात येत आहे. या विद्यापीठाच्या लॅबोरेटरीतून बॉम्ब बनवण्यासाठी केमिकल चोरली होती. त्यांचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी कसा करायचा, याचे मार्गदर्शन मिळवले होते, असेही परवेज मुझम्मिलने कबूल केले, तर डॉ. शाहिनने ती महिलांच्या आत्मघातकी पथकाची उभारणी करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, तपास यंत्रणांतील अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर आत्मघातकी बॉम्बर्सची एक टीम तयार करत होता. डॉ. उमर नबी स्वतःसारख्या अधिक आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होता. तो तरुणांचे ब्रेन वॉश करण्यासाठी त्यांना प्रेरणादायी व्हिडीओ तयार करून पाठवत होता. हे व्हिडीओ ११ व्यक्तींना पाठवण्यात आले होते, त्यापैकी सात काश्मिरी होते आणि ते सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे विद्यापीठाशी जोडलेले होते. उर्वरित चारजण उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमधील असल्याचे सांगितले जाते.


दिल्ली स्फोट प्रकरणी चार आरोपींना अटक


दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या सहा झाली आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या प्रोडक्शन ऑर्डरवर एनआयएने जम्मू आणि काश्मीरमधून चारही आरोपींना ताब्यात घेतले. चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी डॉ. मुजम्मिल शकील गनई, अनंतनाग येथील रहिवासी डॉ. आदिल अहमद राथेर, लखनऊ येथील रहिवासी डॉ. शाहीन सईद आणि शोपियां येथील रहिवासी मुफ्ती इरफान अहमद वागे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आली आहे. एनआयएने आधीच दोन इतर आरोपींना अटक केली आहे.

Comments
Add Comment

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

लवकरच 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार बॉर्डर २ सिनेमा

सिनेमागृहात आपली दमदार छाप पाडल्यानंतर आता लवकरच बॉर्डर 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. १९९७

भूमी पेडणेकरचा मराठमोळा लुक व्हायरल, पैठणी आणि चंद्रकोरनं चाहते घायाळ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकताच सोशल मिडियावर तिच्या मराठमोकळ्या लुकचे काही फोटो शेअर केले

Sharukh Khan : शाहरुखचा मन्नत बंगला लवकरच दिसणार नव्या स्वरुपात, सीआरझेडकडून मिळाला मोठा दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा जगप्रसिद्ध असून हा बंगला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुकतेनं येतात. मात्र, गेल्या