माजी गृहमंत्र्यांचा मुलगा भाजपच्या वाटेवर ?

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पण ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलील देशमुख यांनी राजीनामा पाठवून दिला आहे. तब्येतीचे कारण देत सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करण्यासाठी पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सलील देशमुख यांनी पत्रातून शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कळवले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन उद्या दुसऱ्या पक्षात जाणार का असा प्रश्न काही पत्रकारांनी विचारताच उद्याची परिस्थिती काय असेल ते माहिती नाही. सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत आहे, असे सलील देशमुख म्हणाले.

सलील देशमुख यांनी काटोल मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत