अनिल अंबानी यांच्या आणखी १४०० कोटींची मालमत्ता जप्त ईडीकरून आणखी एक धक्कादायक कारवाई

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांची आणखी १५०० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचनालय (Enforcement ED) संस्थेने जप्त केली आहे. यापूर्वी त्यांची कथित घोटाळ्याप्रकरणी ७५०० कोटी रूपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली होती आता एकूण ९००० कोटींची ही जप्ती करण्यात आली आहे. सध्या अनिल अंबानी व अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कंपनीकडून ही एका जुन्या परकीय चलन व्यवस्थापना कायद्याअंतर्गत (Foreign Exchange Management Act FEMA) चौकशी सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र नियामकांनी (Regulatory Authorities) अनिल अंबानी यांच्या कर्ज निधी उभारणीत व त्यांच्या विनियोगात अनियमितता आढळून आली होती. त्याचाच पुढील अध्याय म्हणून अनिल अंबानी यांच्यावर नवी कारवाई करण्यात आली आहे.


३ नोव्हेंबरला दिलेल्या आदेशानुसार, ७५०० कोटींच्या जप्तीची घोषणा करण्यात आली होती ज्यात आणखी १४०० कोटींच्या मालमत्तेची भर पडली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन (Rcom), रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), रिलायन्स पॉवर (Reliance Power) या अनिल अंबानी यांच्या समुहातील कंपन्यांनी विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्ज निधीचा वापर उद्देशित कारणासाठी न वापरता तो गैरप्रकार करत शेल कंपनीमार्फत वळवण्यात आला असा आरोप ईडी व सीबीआयने यापूर्वी केला होता. त्यातील १६६९४ कोटींचे कर्ज अद्याप फेडले गेले नसल्याने बँकांनी अनिल अंबानी व समुहाने घेतलेल्या कर्जांना 'फ्रॉड' घोषित करण्यात आले होते. मात्र अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी सारे आरोप फेटाळून हे जुने प्रकरण असल्याचे म्हणत पत्रकारांनी चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याचे म्हटले होते.


आरोपातील माहितीनुसार,१३६०० कोटींची फेरफार करण्यात आली होती. त्यातील १२६०० कोटींचा वापर आपल्या संस्थांसह संबंधित संस्थांमध्ये गुंतवले असल्याचे नियामकांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. ३१ ऑक्टोबरला ईडीने पीएमएलए (Prevention on Money Laundering Act PMLA) कायद्याअंतर्गत अनिल अंबानी यांच्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या व कंपनीच्या ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करत या मालमत्ता जप्त केल्या होत्या. ३ नोव्हेंबरच्या नव्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अधिकच चर्चेत असून नव्या घडामोडींच्या माहितीच्या आधारे ईडीने आणखी १४०० ते १५०० कोटींच्या मालमत्तेवर धाड टाकली आहे.

Comments
Add Comment

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी मुंबई :

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा

सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा

मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने