पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी पेटवत आहेत. मात्र थंडीच्या दिवसात पुणे पालिकेने शेकोटी न पेटवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वायू प्रदूषण होत असल्यामुले पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शेकोटी न पेटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुणी शेकोटी पेटताना दिसल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
पुणे पालिकेच्या निर्णयाबाबत सविस्तर
"पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिघांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धूरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होत नसून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे."
"केंद्र आणि राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि 'हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१' अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६' कलम १५ (छ) आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमच्या २०२२ च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उघड्यावर कोळसा किंवा जैविक पदार्थ (प्लास्टिक / रबर) आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे."
पुणे: 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशीने आता कमळ हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी पिट्या भाईने संघाच्या गणवेशातील ...






