पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जरी करण्यात आला असून, लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचली नसेल, तर त्यासाठी संपर्काची योग्य माहिती सरकारने उपलब्ध करून दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथून या हप्त्याचे वितरण सुरू केले. सुमारे अठरा हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.


जर तुम्ही लाभार्थी यादीत असल्याची खात्री असूनही २१ वा हप्ता मिळाला नसेल, तर मदतीसाठी पुढील मार्गांचा वापर करू शकता:



संपर्कासाठी हेल्पलाइन


ई-मेल: pmkisan-ict@gov.in


हेल्पलाईन क्रमांक: 155261, 1800-11-5526 (टोल-फ्री), 011-23381092


या माध्यमातून तुम्हाला अर्ज व हप्ता संबंधित समस्या, सुधारणा आणि मार्गदर्शन मिळू शकते.


तुमचा हप्ता आला नसेल तर काय करावे ?


अधिकृत वेबसाइटला भेट द्या: pmkisan.gov.in


"शेतकरी कॉर्नर" मध्ये जाऊन "लाभार्थी स्थिती" (Beneficiary Status) निवडा.


तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती तपासा.


नोंदणी क्रमांक माहित नसल्यास "नो युअर रजिस्ट्रेशन नंबर" पर्याय वापरून तो मिळवू शकता.


कॅप्चा व OTP भरल्यानंतर तुम्हाला पैसे का आले नाहीत याची अचूक माहिती दिसेल.



काय आहेत पैसे थांबण्याची कारणे?


eKYC पूर्ण नसणे


बँक खात्यातील त्रुटी किंवा खाते–आधार लिंक नसणे


अर्ज करताना दिलेली चुकीची माहिती


आधार क्रमांक किंवा खाते क्रमांकातील तांत्रिक विसंगती


वरील त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुढील हप्त्यापासून तुमच्या खात्यात पैसे नियमित येऊ लागतील.


योजनेअंतर्गत २१ व्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याची माहिती शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे देखील पाठवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी