'पिट्या भाई'ने कमळ घेतले हाती! अभिनेता रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशीने आता कमळ हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी पिट्या भाईने संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट करत 'मी माझ्या विचारांसोबत, राष्ट्रप्रथम' असे कॅप्शन लिहले होते. सोशल मीडीयावरील या अचानक केलेल्या पोस्टमुळे रमेश परदेशी हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र रमेश परदेशीने काल (१८ नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितत रमेश परदेशी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.



विशेष म्हणजे रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यात भरलेल्या मनसे मेळाव्याला रमेश उपस्थित होता. या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमेश परदेशीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटो शेअर केल्यावरुन सुनावले होते. "छाती ठोकपणे सांगतो मी संघाचा कार्यकर्ता आहे, असे म्हणताय तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा", अशा शब्दाच ठाकरेंनी रमेशला प्रश्न केला होता.



Comments
Add Comment

उबाठाच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड

श्रद्धा जाधव यांची क्षमता, तरी दाखवला अविश्वास मुंबई : मुंबई महापालिकेत उबाठाच्या नेतेपदी माजी महापौर किशोरी

शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुनावणी लांबणीवर

‘तारीख पे तारीख’ सुरूच नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

मुंबईत उबाठाचा पहिला नगरसेवक फुटला

सरिता म्हस्के शिवसेनेच्या संपर्कात; कल्याण-डोंबिवलीत ११ पैकी ४ नगरसेवक फुटले मुंबई : कल्याण डोंबिवली

मुंबईत उबाठाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का, 'या' पहिल्या महिला नगरसेविकाचा होणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाला मुंबईत पहिलाच मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रालयातून समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ दिसण्यासाठी सरकारच मोठं पाऊल ..

मुंबई : मुख्य मंत्रालय सरकारी कामासाठी अपुरे पडत आहे. याशिवाय जागा कमी असलयाने मंत्रयांची गैरसोयही होत आहे.