राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार; शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढणार?

सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही शिवसेना-भाजपने आम्हाला डावलले - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांचा थेट आरोप


संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याची तयारी असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाने गोंधळ घालून राष्ट्रवादी काँग्रेसला पद्धतशीरपणे डावलले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे संगमनेरमधील शिवसेना आणि भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या आणि जागा देण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर येथील स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही. डॉ. विखे पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने शब्द दिला असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपने आम्हाला डावलले असून शिवसेना व भाजपा उमेदवारांचे अर्ज भरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही असे थेट आरोप कपिल पवार यांनी केले आहेत.


महायुतीच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टींना येथील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही, असा पवित्रा घेत, आम्हाला आमच्या पक्षाचे अस्तित्व आहे त्यामुळे आम्हाला लढायचं आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या जागा ताकदीने स्वबळावर लढवणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या विजयाच्या समीकरणांवर थेट परिणाम करेल.


एकंदरीत, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना आता स्वबळावर उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे.


आमदार सत्यजित तांबे यांनी सेवा समितीच्या उमेदवारांना मतदान करायला लावले आणि जर निवडणुकीनंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तर आम्ही कोणाकडे जायचे ? असा प्रश्न एक विशिष्ट समाज दबक्या आवाजात करत असल्याने या चर्चेमुळे संगमनेरच्या राजकारणात एक प्रकारे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे.

Gold Silver Rate Today: अखेर ४ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्यात व सलग दुसऱ्यांदा चांदीत वाढ का होत आहे ? 'हे' आहेत आजचे दर

मोहित सोमण: गेले ४ दिवस घसरणीला ब्रेक लागला असून आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने आज

सम्राट चौधरींना 'मोठा माणूस' म्हणून संबोधून भाजपने खेळली नवी खेळी

बिहार : बिहार निवडणुकीत सम्राट चौधरी यांच्यावर लावण्यात आलेल्या असंख्य आरोपांनंतरही भाजपने त्यांच्यावर

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला

क्विक हीलने टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ लाँच सायबर क्राईमपासून आता संपूर्ण मुक्ती मिळणार

मुंबई: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल