सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी
उत्तर प्रदेश : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही, असे म्हणत सामाजिक मूल्ये आणि परंपरांच्या विरुद्ध मानल्या जाणाऱ्या या प्रथांवर नाराजी व्यक्त केली. उत्तर प्रदेश मुझफ्फरनगर येथील सोरम गावात सातव्या सर्वखाप पंचायतीचे उद्घाटन करण्यात आले. तीनदिवसीय पंचायतीच्या पहिल्या दिवशी खाप चौधरी आणि ठाणेदारांनी सामाजिक दुष्कृत्यांवर टीका केली. तसेच शिक्षण, औषध आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. लिव्ह-इन सिस्टीमवर तीव्र नाराजी व्यक्त करत खाप चौधरींनी केंद्र सरकारकडून ही प्रथा रद्द करण्याची मागणी केली. शुक्रतीर्थ भागवत पीठाचे प्रमुख स्वामी ओमानंद आणि बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे उपस्थित होते. याव्यतिरिक्त, त्यांनी व्यासपीठावरून तरुणांना ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. व्यासपीठावरून खाप चौधरींनी आपले विचार व्यक्त केले.
सर्वखाप सर्वजाती पंचायतीत पहिल्या दिवशी काय ठरलं?
- रात्री १२ नंतर लग्न समारंभ होऊ नयेत.
- मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या शाळा आणि महाविद्यालये उघडली पाहिजेत.
- स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध संपूर्ण समाजाने एक झाले पाहिजे.
- हुंडा पद्धती आणि बळी प्रथा बंद करण्यासाठी ठराव मांडण्यात आला.
- समाजात लिव्ह-इन रिलेशनशिपला परवानगी देऊ नये.
- कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असण्यावरही समाजाने चिंतन करावे.
- ड्रग्ज महसूल वाढवतात पण पिढ्या उद्ध्वस्त करताहेत.
- मोबाइल फोन मुळे मुलं बिघडताहेत.- मुलांना महापुरुषांचे चरित्र शिकवण्यावर भर द्या.
- मुलांना स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तीबद्दल शिकवणे महत्त्वाचे आहे.






