भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा झाल्याच पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी यावेळी थेट पंचांना घेरत खेळ थांबवला. हा प्रकार दहाव्या षटकाच्या वेळी घडला.


भारताचा सुयश शर्मा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला असताना षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ही गोष्ट घडली. यावेळी समोरून माझ सदाकत फलंदाजी करत होता. सदाकतने, सुयशच्या बॉलवर जोरात फटका मारल्याने षटकार जाईल असे सर्वांना वाटले. पण त्यावेळी तिथे नेहाल वढेरा धावत आल्याने सर्वांना वाटले की, पाकिस्तानचा फलंदाज बाद होईल. मात्र नेहलने रेषेपलिकडे जाणाऱ्या बॉलला एका हाताने मैदानाच्या आत फेकले आणि ती कॅच नमन धीरने पकडली. या कॅचमुळे भारतीय संघाने उत्साहाला सुरूवात केली.




दरम्यान, मैदानातील पंचांनी कॅच पकडली की नाही, हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी ही कॅच ३-४ वेळा पाहिली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजाला नाबाद घोषित केले. नवीन नियमामुळे असे बाद देता येणार नाही, असे पंच सांगत होते. पण भारताच्या खेळाडूंनी पंचांना घेराव घातला आणि सामना थांबवला. यावेळी भारताच्या प्रशिक्षकांना समजवण्यासाठी चौथ्या पंचांना मैदानात यावे लागले. या चौथ्या पंचांनी भारताच्या प्रशिक्षकांना नाबाद का दिले, त्याचे कारण सांगितल्यावर हा सामना सुरु करण्यात आला.

Comments
Add Comment

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९