Monday, November 17, 2025

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा झाल्याच पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी यावेळी थेट पंचांना घेरत खेळ थांबवला. हा प्रकार दहाव्या षटकाच्या वेळी घडला.

भारताचा सुयश शर्मा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला असताना षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ही गोष्ट घडली. यावेळी समोरून माझ सदाकत फलंदाजी करत होता. सदाकतने, सुयशच्या बॉलवर जोरात फटका मारल्याने षटकार जाईल असे सर्वांना वाटले. पण त्यावेळी तिथे नेहाल वढेरा धावत आल्याने सर्वांना वाटले की, पाकिस्तानचा फलंदाज बाद होईल. मात्र नेहलने रेषेपलिकडे जाणाऱ्या बॉलला एका हाताने मैदानाच्या आत फेकले आणि ती कॅच नमन धीरने पकडली. या कॅचमुळे भारतीय संघाने उत्साहाला सुरूवात केली.

दरम्यान, मैदानातील पंचांनी कॅच पकडली की नाही, हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी ही कॅच ३-४ वेळा पाहिली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजाला नाबाद घोषित केले. नवीन नियमामुळे असे बाद देता येणार नाही, असे पंच सांगत होते. पण भारताच्या खेळाडूंनी पंचांना घेराव घातला आणि सामना थांबवला. यावेळी भारताच्या प्रशिक्षकांना समजवण्यासाठी चौथ्या पंचांना मैदानात यावे लागले. या चौथ्या पंचांनी भारताच्या प्रशिक्षकांना नाबाद का दिले, त्याचे कारण सांगितल्यावर हा सामना सुरु करण्यात आला.

Comments
Add Comment