कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कल्पना टॉकीज (कुर्ला) ते पंखे शाह दर्गा (घाटकोपर पश्चिम) असा साडेचार किलोमीटर अंतराचा हा उड्डाणपूल बांधला जाणार असून, प्रकल्पासाठी तब्बल 1365 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.


उड्डाणपूल प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा ठरलेली नौदलाची जमीन अखेर सोडवण्यात आली आहे. पुलाचा एक किलोमीटरचा भाग नौदलाच्या हद्दीशेजारी येत असल्याने दोन वर्षे एनओसी मिळण्यात विलंब झाला. दरम्यान वारंवार पत्रव्यवहार करूनही उत्तर मिळत नव्हते, त्यामुळे प्रकल्पाचा पुढील खर्च, आराखडा आणि निविदा थांबल्या होत्या. नुकतेच नौदलाची ना-हरकत मिळताच व्हीजेटीआयने सर्वेक्षण पूर्ण केले आणि अहवालानंतर निविदा काढण्यात आल्या.


निविदा भरण्याची अंतिम तारीख 6 डिसेंबर असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच काम करणारी कंपनी निश्चित केली जाणार आहे. उड्डाणपुलासाठी दर्जेदार साउंड बॅरिअर्स आणि सुरक्षात्मक पत्रे बसवले जातील, जेणेकरून नौदलाच्या हालचाली दिसणार नाहीत. उड्डाणपुलाची लांबी 4.5 किमी आणि रुंदी 15.50 मीटर असेल. हे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होण्याची महापालिकेची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील

वांद्रे तलाव बनले बकाल, तलावात शेवाळयुक्त दुर्गंधी पाणी आणि कचरा

तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने

दहिसर पूर्वमधील नव्याने बनवलेल्या यशवंतराव तावडे मार्ग खोदला

नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रिट केलेला रस्ता खोदण्याचा प्रताप नवीन केलेला रस्ता खोदायला दिला जाणार

मालाडकरांना छोटा 'केइएम' ची आरोग्य सुविधा, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा