बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल स्पष्ट होताच भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि देशाला संबोधित केले.


एनडीएच्या भक्कम कामगिरीनंतर आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी बिहारमधील नागरिकांचे मनापासून आभार मानले. मतदारयादीच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मोहिमेला सर्वपक्षीय सहकार्य मिळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी विरोधकांवरही टोला लगावत मतदारांच्या जागरूकतेचे कौतुक केले.


मोदी म्हणाले की, “या वेळी दोन टप्प्यात मतदान झाले, पण कुठेही पुनर्मतदानाची वेळ आली नाही. हे शांततापूर्ण मतदानासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, सुरक्षा दलांचे आणि जागरूक मतदारांचे यश आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो.”


पंतप्रधानांनी सांगितले की बिहारने मतदारयादी सुधारण्याच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देऊन लोकशाहीची पवित्रता जपली आहे. “आता प्रत्येक राजकीय पक्षाने बूथवर संघटनांना सक्रिय करून हे काम पुढे न्यायला हवे. जेणेकरून देशभरात मतदारयादी अधिक पारदर्शक बनेल,” असे ते म्हणाले.


मोदी म्हणाले, “लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारने आज पुन्हा एकदा खोट्या राजकारणाला धडा शिकवला. जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की जामिनावर बाहेर असलेल्या नेत्यांना ते साथ देणार नाहीत.”


ते पुढे म्हणाले, “आज भारत खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे, जिथे प्रत्येक कुटुंबाला समान संधी, सन्मान आणि विकासाचा मार्ग खुला आहे. फक्त तात्पुरते खुश करणे नाही, तर लोकांच्या मनात खरी समाधानाची भावना निर्माण करणे हेच जनतेला अपेक्षित आहे."


बिहारमधील कथाकथित ‘जंगलराज’चा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “हा विजय त्या माताभगिनींचा आहे ज्यांनी त्या काळात भीतीचे दिवस पाहिले आहेत, आणि त्या तरुणांचा आहे ज्यांचे भविष्य हिंसाचाराने प्रभावित झाले होते. आता बिहार विकासाच्या दिशेने धावत आहे आणि ही प्रगती थांबणार नाही.”

Comments
Add Comment

Bhojshala Verdict : धारमधील भोजशाळा हे सरस्वतीचेच मंदिर! हायकोर्टाने मशिदीचा दावा फेटाळला

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने (Indoor) शुक्रवारी एका अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट

PM Narendra Modi : यूएईच्या हवाई हद्दीत पंतप्रधान मोदींच्या विमानाला 'एफ-१६' ची सुरक्षा; एस्कॉर्टचा व्हिडिओ व्हायरल

अबू धाबी : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्याची सुरुवात अत्यंत

Dharmendra Pradhan on NEET : NEET विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: पुर्नपरीक्षेसाठी शुल्क नाही, जुनी फी परत मिळणार! : धर्मेंद प्रधान

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या NEET-UG 2026 परीक्षेच्या

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.