पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि पिसे पांजरापूर येथील जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. सध्या पिसे पांजरापूर येथे ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र असून याठिकाणी आता आणखी ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची क्षमता आता अधिक वाढली जाणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता प्रती दिन १८२० दशलक्ष लिटर एवढी होणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्रातून पूर्व आणि पश्चिम उपनगराला पाणी पुरवठा केला जातो.


मुंबईला शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १९७९ मध्ये म्हणजे ४६ वर्षांपूर्वी पिसे पांजरापूर येथे ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दी करण उभारण्यात आले. परंतु जलशुध्दीकरण प्रक्रियेत जलवाहिनींची झीज झाल्याने तसेच जलप्रक्रिया केंद्राचे आयुष्यमान संपुष्टात आल्याने त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भविष्यात पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये म्हणून ते त्वरीत बदलण्यासाठी टप्पा एकमधील बॉम्बे १मधील जलप्रक्रिया केंद्र जुने असल्यामुळे याला बांधण्यास काही वर्षे लागणार असल्याने ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलप्रक्रिया केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या जलशुध्दीकरण केंद्राची बांधणी झाल्यानंतर जुना ४५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचाे जलप्रक्रिया केंद्र बंद करण्यात येईल. नवीन बांधण्यात येणाऱ्या ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन जलशुदीकरण केंद्राीतील उर्वरीत ४५५ दशलक्षलिटरची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठीही वापरली जावू शकते.



अशाप्रकारे पिसे पांजरापूर संकुलाची एकूण क्षमता सध्याच्या १३६५ वरून १८२० दशलक्ष लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवली जाईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन जलशुध्दीकरण केंद्राची संकल्पना बॅक वॉश पुनर्वापर प्रवाहासह सामान्य जलप्रवाह क्षमता ९१० दशलक्ष लिटर प्रती दिन असेल. जलशुध्दीकरण केंद्र कमी जागेत विकसित करण्यासाठी प्रगत अशा हाय रेट ग्रॅव्हिटी फिल्ट्रेशनसह ऍडवान्स कॉग्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण केले जाईल आण पुढील १५ वर्षांची देखभाल संबंधित कंत्राटदार संस्थेवर राहील. येथील ७.६ हेक्टर जागेत नवीन ९१० क्षमतेचा नवीन जलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी वेलस्पन एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांस ४४६३.६३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कोटी रुपये

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.