राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही ठिकाणी पाऊस, तर काही भागात कडाक्याची थंडी अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. त्याच वेळी महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि थंड वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.


अरबी समुद्रावर केरळच्या किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण भारतातील हवामानही अस्थिर आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याचं भाकीत आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, निफाड, परभणी आणि जेऊर या भागांत थंडीचा कडाका अधिक जाणवतोय. पुण्यातही किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी 4 ते 5 अंशांनी घटण्याची शक्यता वर्तवली आहे.


गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी आणि पहाटे गारवा वाढला आहे. हवेत कोरडेपणा जाणवू लागला असून, नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.


महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसासोबत थंडीची लाटही नागरिकांना जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यातील हवामान बदलत राहण्याची शक्यता असून, हिवाळ्याची चाहूल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील