पाकिस्तानच्या खेळाडूंनी मारले इंग्रजीचे षटकार

हाँगकाँग : पाकिस्तानने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने कुवेतवर मात करून हा किताब जिंकला. मात्र, विजयाऐवजी पाकिस्तानची टीम सोशल मीडियावर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.


पुरस्कार वितरण सोहळ्यात पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्यासोबत असलेले अनुवादक (पीसीबीचे मीडिया अधिकारी) इंग्रजीत जे काही बोलले त्यावरुन ते चेष्टेचा विषय झाले आहे. खेळाडू आणि मीडिया अधिकारी या दोघांचे इंग्रजी अतिशय वाईट असल्याचे कार्यक्रमावेळी दिसून आले. आता याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.




सामन्याच्या कामगिरीकडे पाहिलं तर मोहम्मद शहजाद, अब्बास अफरीदी आणि अब्दुल समद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 52 धावा आणि 1 विकेट अशी दमदार कामगिरी करणाऱ्या अब्बास अफरीदीला सामनावीर घोषित करण्यात आलं. पाकिस्तानने हाँगकाँग सिक्सेसचा किताब सहाव्यांदा जिंकत इतिहास रचला. याआधी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने प्रत्येकी पाच वेळा हा किताब जिंकला होता. त्यामुळे सर्वाधिक वेळा हा किताब जिंकणारा देश म्हणून पाकिस्तानचं नाव नोंदवलं गेलं आहे.


अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत अवघ्या 6 षटकांत 135 धावा केल्या. कर्णधार अब्बास अफरीदीने केवळ 11 चेंडूत 52 धावा ठोकल्या, ज्यात 2 चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा समावेश होता. अब्दुल समदनेही 13 चेंडूत 42 धावांची झळाळती खेळी केली, तर ख्वाजा नफयने 6 चेंडूत 22 धावा केल्या.


कुवेतकडून मीत भावसारने सर्वाधिक तीन बळी घेतले. 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुवैतची सुरुवात चांगली झाली होती. अदनान इदरीस आणि मीत भावसार यांनी पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. इदरीसने 8 चेंडूत 30 धावा करत पाच षटकार ठोकले, तर भावसारने 12 चेंडूत 33 धावा केल्या. पण या दोघांच्या बाद झाल्यानंतर कुवैतची फलंदाजी कोसळली आणि संपूर्ण संघ 92 धावांवर गारद झाला.

Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार