बिहार निवडणुकीचा प्रचार संपला

दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ जागांवर मंगळवारी मतदान


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी २० जिल्ह्यांमधील १२२ विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. रविवारी प्रचार संपला असून रात्रीच्या प्रचाराला आता वेग येणार आहे.


बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.९५ कोटी पुरुष आणि १.७४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण १,३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भविष्य आजमावत आहेत. निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. तब्बल ४ लाखांहून अधिक सुरक्षा जवान विविध मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत. नेपाळची सीमा ११ नोव्हेंबरपर्यंत सील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये ६५ टक्के मतदान झाले होते. या वाढीव मतदानामुळे दुसऱ्या टप्प्यातील उरलेल्या प्रचाराच्या सभांना गर्दी जमविण्यासाठी सर्वच पक्ष मेहनत घेत होते. हा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने जाणार असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. १४ नोव्हेंबरला बिहार निवडणुकाचा निकाल लागणार आहे.


संवेदनशील मतदान केंद्रे आणि वेळेत बदल
दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ४५,३३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी ४,१०९ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यातील ४,००३ बूथ 'अतिसंवेदनशील' गटात मोडतात. नक्षलग्रस्त भागांचा विचार करून, कटरिया, बेलहर, चैनपूर, कुटुंबा, औरंगाबाद, शेरघाटी यांसारख्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंतच चालणार आहे, तर इतर ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी

पाकिस्तानला फुटणार घाम ! रशियाने भारताला दिली मोठी गुड न्यूज, लवकरच...

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी मात्र पाकिस्तानला घाम फोडणारी अशी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न