पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या फलंदाजीदरम्यान ४.५ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. यामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.


ऑस्ट्रेलियाने दुसरा टी-२० सामना चार विकेट्सने जिंकला होता. तर भारताने तिसरा आणि चौथा टी-२० सामना जिंकला. टीम इंडियाने तिसरा टी-२० सामना पाच विकेट्सने आणि चौथा टी-२० सामना ४८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा सलग चौथा द्विपक्षीय टी-२० मालिका विजय आहे.


यापूर्वी, भारताने २०२०/२१ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. २०२२ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा पराभव केला होता. २०२४/२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असा पराभव केला होता आणि आता २०२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक