पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या फलंदाजीदरम्यान ४.५ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. यामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.


ऑस्ट्रेलियाने दुसरा टी-२० सामना चार विकेट्सने जिंकला होता. तर भारताने तिसरा आणि चौथा टी-२० सामना जिंकला. टीम इंडियाने तिसरा टी-२० सामना पाच विकेट्सने आणि चौथा टी-२० सामना ४८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा सलग चौथा द्विपक्षीय टी-२० मालिका विजय आहे.


यापूर्वी, भारताने २०२०/२१ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. २०२२ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा पराभव केला होता. २०२४/२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असा पराभव केला होता आणि आता २०२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या