पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या फलंदाजीदरम्यान ४.५ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. यामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.


ऑस्ट्रेलियाने दुसरा टी-२० सामना चार विकेट्सने जिंकला होता. तर भारताने तिसरा आणि चौथा टी-२० सामना जिंकला. टीम इंडियाने तिसरा टी-२० सामना पाच विकेट्सने आणि चौथा टी-२० सामना ४८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा सलग चौथा द्विपक्षीय टी-२० मालिका विजय आहे.


यापूर्वी, भारताने २०२०/२१ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. २०२२ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा पराभव केला होता. २०२४/२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असा पराभव केला होता आणि आता २०२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून