असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला केवळ ११९ धावांवर रोखले आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.


या विजयात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाज म्हणून त्याने १८ चेंडूत २२ धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेले, तर गोलंदाज म्हणून फक्त दोन षटकांत २० धावा देत मिचेल मार्श आणि टीम डेव्हिड या दोन प्रमुख खेळाडूंना माघारी पाठवले. त्याच्या या डावाने सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.


सामन्यानंतर दुबेने आपल्या यशामागील गोष्ट उघड केली. त्याने सांगितले की प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सतत आत्मविश्वास वाढवला आणि आक्रमक गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या सूचनांमुळे त्याच्या बॉलिंगमध्ये सुधारणा झाली. तसेच मोठ्या सीमारेषेचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठे शॉट खेळण्यास प्रवृत्त करण्याची रणनिती त्याने वापरली.


दरम्यान, त्याने मारलेल्या एका षटकाराची विशेष चर्चा रंगली. एडम झाम्पाच्या चेंडूवर त्याने स्टंपबाहेरचा बॉल अचूक टायमिंगने १०६ मीटर लांब पाठवला की बॉल थेट मैदानाच्या बाहेरच गेला.

Comments
Add Comment

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२०

अक्षर पटेलची दमदार कामगिरी ! विराट आणि ख्रिस गेलशी बरोबरी

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 'कांगारुं'चा उडवला धुव्वा!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड ; मालिकेत २-१ ने आघाडी; वॉशिंग्टनच्या फिरकीची जादूने ८ चेंडूत ३ बाद कॅरारा :

कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यात मोठा निर्णय घेणार ? उपकर्णधार शुभमन गिलची जागा धोक्यात!

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचा चौथा सामना गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्णायक सामना, टीम इंडिया सामन्यासाठी सज्ज

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात करत तिसऱ्या टी