चीनचे अंतराळवीर अवकाश स्थानकात अडकले

बीजिंग : चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. चीनच्या अंतराळ स्थानकाला सूक्ष्म अंतराळ कचऱ्याची टक्कर झाल्यामुळे बुधवारी ठरलेली अंतराळवीरांची परतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती चायना मॅनड स्पेस एजन्सी (सीएमएसए) ने दिली आहे.


एजन्सीने सांगितले की हा निर्णय अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणि मिशनच्या यशासाठी खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे. चीन दर सहा महिन्यांनी आपल्या अंतराळ स्थानकावरील दलाची अदलाबदल करतो. गेल्या शनिवारी शेनझोउ-२० अंतराळयानाने शेनझोउ-२१ मोहिमेच्या क्रूसह कक्षेत ‘हँडओव्हर प्रक्रिया’ पूर्ण केली होती. अंतराळ स्थानकाच्या ‘चाव्या’ मंगळवारी औपचारिकपणे नव्या दलाकडे सुपूर्द करण्यात आल्या.


शेनझोउ-२० मोहिमेतील तीन अंतराळवीर — चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जिए — यांनी आपले सर्व नियोजित काम पूर्ण केले होते आणि बुधवारी इनर मंगोलियातील डोंगफेंग लँडिंग साइटवर उतरण्याचे नियोजन होते. मात्र, अंतराळ कचऱ्याच्या टक्करमुळे त्यांची परतीची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


दरम्यान, चीनने अलीकडेच शेनझोउ-२१ अंतराळयानाद्वारे तीन नवीन अंतराळवीरांना सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी आपल्या कक्षीय स्थानकावर पाठवले आहे. यापूर्वी चीनने जाहीर केले होते की २०३०पर्यंत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य त्यांनी निश्चित केले आहे आणि त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. चीनच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाचे प्रवक्ते झांग जिंगबो यांनी सांगितले होते की सध्या मानवयुक्त चंद्र मोहिमेशी संबंधित सर्व संशोधन आणि विकास प्रकल्प सुरळीतपणे सुरू आहेत. लॉन्ग मार्च-१० रॉकेट, चंद्र लँडिंग सूट आणि एक्सप्लोरेशन व्हेईकल यांसारख्या प्रकल्पांवर जोरदार काम सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले — “२०३० पर्यंत चीनचा एक नागरिक चंद्रावर पाऊल ठेवेल, हा आमचा निर्धार दृढ आणि अढळ आहे.”

Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार