मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत मिळवण्यासाठी करावी लागणारी डोकेफोड आता लाकरच दूर होणार आहे , विमान तिकीट बुकिंग केल्यांनतर ते ४८ तासात रद्द केल्यास प्रवाश्याना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द किंवा त्यात बदलही करता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकाने (डीसीजीए) यांनी हा बदल प्रस्तावित केला आहे. विमान कंपनीच्या संकेत स्थळावरून तिकीट बुक करून रद्द केल्यास रकमेचा परतावा हा कार्यालयीन २१ दिवसाच्या आत प्रवाश्याना मिळणार आहे. ट्रॅव्हल एजन्ट किंवा पोर्टलद्वारे तिकटी खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एरलाईन्सवर राहील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.
बुकिंग तारीखेपासून देशांतर्गत उड्डाणासाठी ५ दिवसांपेक्षा कमी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला असेल तर या सुविधेचा वापर करता येणार नाही, वापर करायचा असल्यास अधिक पैसे मोजावे लागतील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.
'डीसीजीए'ने असा निर्णय का घेतला ?
दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाश्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत विमानाच्या संख्येत असलेली तफावत यामुळे प्रवासाचे दर वर्षभर गगनाला भिडलेले दिसतात. अश्या स्थितीत विमान तिकीट रद्द झाले तर कंपन्या घसघशीत शुल्क आकारणी करतात आणि प्रवाशाच्या अधिक पैसे जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशाचे नुकसान होऊ नये याकरिता हा प्रस्ताव डीसीजीए सर्व विमान कंपन्यांसमोर मांडणार आहे.






