किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या सर्वांना आरक्षण दिले. पण लष्करात जाती-पातीच्या आधारावर आरक्षण? मला वाटते की, याची चर्चा देखील झाली नाही पाहिजे. आपल्या सैन्याच्या जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे ‘सैन्य धर्म’, त्याव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नसतो. राहुल गांधी हे संरक्षण दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की किमान आपल्या लष्कराला राजकारणात ओढू नका, असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.


उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यादरम्यान प्रचार सभेत बोलताना सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर लष्कराला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि लष्करात विविध समाजांसाठी आरक्षणाची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका देखील केली.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्करावर केवळ १० टक्के लोकांचे नियंत्रण असल्याचे वक्तव्य केले आहे , यावरून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी त्यांच्यावर टीका केली. संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भारतीय लष्कराला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आऱोप केला. यावेळी त्यांनी , “सैन्याला कोणताही धर्म किंवा जात नसते,” असेही स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Vietnamese President To Lam : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी पंतप्रधान मोदींची हैदराबाद हाऊसमध्ये भेट

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज हैदराबाद हाऊस येथे

Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी

“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या