राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई


नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी, महामार्ग मंत्रालयाने बांधा-वापरा-हस्तांतरित (बीओटी) करा मॉडेलअंतर्गत बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या एका विभागात एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.


रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव व्ही. उमाशंकर म्हणाले की, महामार्ग मंत्रालयाने बीओटी दस्तऐवजात सुधारणा केली आहे. आता कंत्राटदार अपघात व्यवस्थापनासाठी जबाबदार असतील आणि त्यांनी बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागात निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास सुधारणात्मक पावले उचलली जातील. ते म्हणाले, जर एखाद्या विभागात ५०० मीटरमध्ये एकापेक्षा जास्त अपघात झाले, तर कंत्राटदाराला २५ लाख रुपये दंड आकारला जाईल. पुढच्या वर्षी पुन्हा अपघात झाला तर दंडाची रक्कम ५० लाख रुपयांपर्यंत वाढेल. उमाशंकर म्हणाले की, महामार्ग मंत्रालयाने ३,५०० अपघातप्रवण क्षेत्रे चिन्हांकित केली आहेत.


१.८० लाख अपघाती मृत्यू संपूर्ण भारतातील रस्ते अपघातांमधील मृत्यूसंख्या अंदाजे १.८० लाख एवढी आहे. यामध्ये महामार्ग व इतर सर्व रस्त्यांचा समावेश. भारतात राष्ट्रीय महामार्ग हे संपूर्ण रस्त्यांच्या २ टक्के आहेत, पण अपघातांमधील मृत्यूंमध्ये त्यांचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा जास्त.अपघातांमध्ये दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक. अतिवेग, वाहनचालकाने चुकीचे वाहन चालवणे, हेल्मेट/सीटबेल्ट न वापरणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन.


महाराष्ट्रात काय स्थिती?


महाराष्ट्रात २०२४ मध्ये महामार्गांवर ३६,०८४ अपघात झाले असून, यामध्ये १५,३३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात अपघाती मृत्यूंची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. २०२३ मध्ये देशात एकूण ४.४४ लाख अपघाती मृत्यू झाले असून हा आकडा २०२२ च्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या दशकात (२०१३–२०२३) अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली