Breaking: देशाचे 'जीपी' म्हणून ओळखले जाणारे नामांकित उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचे ८५ व्या वर्षी निधन

प्रतिनिधी:हिंदुजा उद्योगसमूहाचे आश्रयस्थान व चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. ते ८५ वर्षाचे होते. थोरले बंधु श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांनी चेअरमन पदाची सूत्रे २०२३ दरम्यान हाती घेतली होती. व्यवस्थापनावर त्यांच्या हातखंडा होता त्यांच्या कार्यकुशलतेमुळे उद्योगसमुहाचा विस्तार सुरू होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. 'जीपी' म्हणून नावाने प्रसिद्ध असलेले हिंदुजा हिंदुजा समुह (Hinduja Group) व हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेड (Hinduja Automotive Limited) या दोन संस्थाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.


सिंधी कुटुंबात जन्म झालेल्या हिंदुजा यांनी १९५९ साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. गल्फ ऑईलचे १९८४ अधिग्रहण व अशोक लेलँडचे १९८७ अधिग्रहण यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. हिंदुजा समुह तेल, उर्जा, फायनान्स, केबल टेलिव्हिजन, लुब्रिकंट, ट्रक निर्मिती, मिडिया, बँकिंग अशा विविध श्रेत्रात कार्यरत असणारा बहुराष्ट्रीय समुह (Multinational Corporation) आहे.

Comments
Add Comment

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी मुंबई :

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा

सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा

मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने