बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री बाराबंकी येथील देवा-फतेहपूर रस्त्यावर बिशुनपूर शहराजवळ घडला. वेगाने येणारा एक ट्रक आणि अर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करावे लागले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाराबंकी अपघाताव्यतिरिक्त, सोमवारी जयपूर आणि हैदराबाद या दोन शहरांमध्येही असेच मोठे आणि भीषण अपघात झाले आहेत. जयपूर येथे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, हैदराबाद (Hyderabad) येथे झालेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तीन मोठ्या अपघातांमध्ये एकाच दिवशी एकूण ३८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, ज्यामुळे देशभरात रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#WATCH उत्तर प्रदेश: बाराबंकी में देवा थाना क्षेत्र के अंतर्गत देवा-फतेहपुर मार्ग पर ट्रक और कार की टक्कर में छह लोगों की मौत हो गई, दो घायल हो गए। pic.twitter.com/0jEf2DONSP
— ANI_HindiNews (@AHindinews) November 4, 2025
चालक, सोनी कुटुंबासह ६ ठार; गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक
या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सदस्यांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये चालक श्रीकांत शुक्ला, प्रदीप सोनी, त्यांची पत्नी माधुरी सोनी आणि मुलगा नितीन यांचा समावेश आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. कारमध्ये असलेले सर्व लोक कानपूरमधील बिठूर (Bithoor) येथील गंगेत पवित्र स्नान करून परतत असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. या अपघातात कारमधील ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना त्वरित बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने, सर्व जखमींना तातडीने लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
          नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला. या विजयाने महिला क्रिकेटचे संपूर्ण ...
अपघाताचे कारण 'वेग'
पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हा अपघात अनियंत्रित वेगामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवली आणि रस्त्यावरील वाहतूक त्वरित पूर्ववत केली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधेश कुमार यादव यांनी जखमींच्या वैद्यकीय उपचाराबाबत माहिती दिली. जखमींना आधी स्थानिक सीएचसीमधून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने, पुढील उपचारांसाठी सर्वांना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये (Lucknow Trauma Center) तातडीने पाठवण्यात आले. या घटनेनंतर रस्ते सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

    




