'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'!


भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले


नवी दिल्ली/चंदीगढ: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कथित "शीशमहल" प्रकरणावरून आता राजकारण पुन्हा तापले असून, हा वाद पंजाबपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीतील भारतीय जनता पक्षाने आरोप केला आहे की, भगवंत मान सरकारने केजरीवाल यांच्यासाठी चंदीगढमध्ये "७-स्टार आलिशान बंगला" दिला आहे.


भाजपने "शीशमहल" चा आपला जुना टोमणा पुन्हा वापरत दावा केला की, सेक्टर २ मधील ही मालमत्ता दोन एकरांमध्ये पसरलेली असून ती मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देण्यात आली आहे. 'सामान्य माणसाप्रमाणे' जगण्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या दुटप्पीपणाचे हे दुसरे उदाहरण आहे, असे भाजपने म्हटले आहे.


आपच्या निलंबित खासदार स्वाती मालीवाल यांनीही या वादात भर घातली. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले की, "दिल्लीचा शीशमहल रिकामा झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना पंजाबमध्ये दिल्लीपेक्षाही अधिक भव्य शीशमहल मिळाला आहे."


मालीवाल यांनी आरोप केला की, भगवंत मान सरकार पंजाबमधील सरकारी यंत्रणांचा वापर केवळ केजरीवाल यांची सेवा करण्यासाठी करत आहे. पंजाब सरकारचे खाजगी विमान त्यांना पक्षाच्या कामासाठी गुजरातपर्यंत घेऊन जाते, असा आरोपही त्यांनी केला.


दुसरीकडे, आम आदमी पक्षाने हे आरोप ‘पूर्णपणे निराधार’ असल्याचे सांगून फेटाळले आहेत. भाजपने दाखवलेली इमारत ही मुख्यमंत्र्यांचे फक्त कॅम्प ऑफिस आहे. 'वाटपाचे पत्र कुठे आहे?' असा प्रश्न विचारत 'आप'ने भाजपकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील

देशभरात साजरा करणार ‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’

नवी दिल्ली : आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेच्या