ताम्हिणी घाटात भीषण अपघात, दरड गाडीवर कोसळल्याने महिलेचा मृत्यू!

रायगड: सनरुफ असलेल्या आलिशान चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही घटना आज सकाळी घडली असून यामध्ये ४३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती आहे.


स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासोबत पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत होत्या. यावेळी ताम्हिणी घाटात त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. या दरडीमध्ये मोठा दगड थेट त्यांच्या गाडीवर आदळला. ज्यामुळे गाडीचे सनरूफ फुटल्याने दगड त्यांच्या डोक्यावर पडला. दरम्यान त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.




या अपघातामुळे आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दरड रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासनाकडून नियमित साफसफाई व सूचना फलक लावले जात असले तरी पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची