बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा


पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज बिहारमधील मतदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही निवडणूक बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवण्यासाठी आहे.


शहा यांनी मतदारांना इशारा दिला की, लालू-राबडींचे ‘जंगलराज’ नवीन नावाने आणि नवीन रूपात बिहारच्या दारावर परत आले आहे. एक छोटीशी चूक राज्याला २० वर्षांनी मागे नेऊ शकते.


नालंदा आणि मुंगेर जिल्ह्यात प्रचारसभांना संबोधित करताना शहा म्हणाले, "६ नोव्हेंबरला मतदान आहे. तुम्ही केवळ आमदार-मंत्री निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात, तर नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास होण्यासाठी मतदान करत आहात. तुमचे प्रत्येक मत जंगलराज थांबवण्यासाठी आहे."


शहा यांनी आरोप केला की, लालू-राबडी आणि काँग्रेस बिहारचे कल्याण करू शकत नाहीत. त्यांनी लालू-राबडी यांच्या राजवटीत उद्योगांना लागलेले टाळे, खून आणि खंडणीसाठी झालेले अपहरण यांसारख्या घटनांची आठवण करून दिली. तसेच, त्यांनी भाजपवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून काँग्रेसवर टीका केली.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा

महामार्गांवर असणार आता ठेकेदारांच नाव आणि पत्ताही

नवी दिल्ली : आता प्रत्येक महामार्गाच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर सहज दिसेल असा मोठा फलक लावला जाईल. या फलकावर संबंधित