२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन


नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका सरकारी प्रकल्पाला प्रोत्साहन देत असल्याचा एक खोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात गुंतवणुकीवर असामान्यपणे जास्त परतावा मिळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.


या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, २१,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा १५ लाख रुपये मिळू शकतात.


प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट-चेकिंग टीमने या व्हिडीओची सत्यता तपासली असून तो डिजिटल पद्धतीने बदललेला आणि पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.


"अर्थमंत्री किंवा भारत सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही किंवा त्याचे समर्थन केलेले नाही," असे पीआयबीने म्हटले आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद गुंतवणूक योजनांना बळी पडू नये आणि कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडून तपासून घ्यावी, असे आवाहन अर्थ मंत्रालयाने केले आहे.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला