२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन


नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका सरकारी प्रकल्पाला प्रोत्साहन देत असल्याचा एक खोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात गुंतवणुकीवर असामान्यपणे जास्त परतावा मिळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.


या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, २१,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा १५ लाख रुपये मिळू शकतात.


प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट-चेकिंग टीमने या व्हिडीओची सत्यता तपासली असून तो डिजिटल पद्धतीने बदललेला आणि पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.


"अर्थमंत्री किंवा भारत सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही किंवा त्याचे समर्थन केलेले नाही," असे पीआयबीने म्हटले आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद गुंतवणूक योजनांना बळी पडू नये आणि कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडून तपासून घ्यावी, असे आवाहन अर्थ मंत्रालयाने केले आहे.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा