भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. लीग टप्प्यात भारताचा शेवटचा सामनाही याच मैदानावर होता जो पावसामुळे रद्द झाला होता. जर आजची सेमी फायनलची मॅच पावसामुळे रद्द झालंली तर फायनलमध्ये कोणत्या संघाला एन्ट्री मिळणार जाणून घेण्यासाठी आधी नियम समजून घेऊ.


मोंथा चक्रीवादळचा तडाखा हा भारताच्या पूर्व किनापट्टीवर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे भारतात ठिकठिकाणी पाऊसही पडतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मात्र गेल्या आठवड्यात आपण पहिले की अनेकवेळा पावसामुळे खेळात व्यत्यय येऊन सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे जर पुन्हा गुरुवारी पावसामुळे खेळ रद्द झाला तर काय होईल याची चिंता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.


सेमी फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर सामना ३० ऑक्टोबरला होऊ शकला नाही. तर तो ३१ ऑक्टोबरला खेळवला जाईल. जर राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाला लीग टप्प्यातील गुणतालिकेनुसार अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.


ऑस्ट्रेलियाने लीग टप्प्यत चांगली कामगिरी केली आहे. पावसामुळे सेमी फायनल झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाला फायदा होऊ शकतो. भारतीय संघाला मात्र फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवणे हाच एकमेव पर्याय आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma : रोहित शर्माला पद्मश्री तर टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

FIFA World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्डकपमधील आठ देशांच्या संघात ५० टक्क्यांहून अधिक खेळाडू परदेशात जन्मलेले

नवी दिल्ली : क्रिकेट किंवा फुटबॉल विश्वचषक तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण 'स्थलांतरितांचा विश्वचषक' अशी संकल्पना

IPL 2027 : सस्पेन्स संपला ! आयपीएल २०२७ मध्येही सीएसकेच्या ताफ्यात दिसणार हा दिग्गज !!

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल २०२६ मधील संघाच्या निराशाजनक

IPL 2027 Mega Trade : IPL मध्ये मेगा ट्रेडचा धमाका! ऋषभ पंत पुन्हा दिल्लीत तर कुलदीप यादव लखनऊच्या ताफ्यात

नवी दिल्ली : लखनऊ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघात परतणार आहे, तर कुलदीप यादव लखनऊ सुपर

India vs Ireland : आयर्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला दुहेरी धक्का! दोन प्रसिद्ध खेळाडू मालिकेबाहेर, इंग्लंड दौऱ्यावरही संकटाचे ढग

मुंबई : आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू

Vaibhav Suryavanshi : स्वप्न साकारलं! टीम इंडियाची जर्सी हातात घेताच वैभव सूर्यवंशी भावूक; म्हणाला...

मुंबई : अवघ्या १५ वर्षांच्या वयात आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव