IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?


नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये लढत होणार आहे. हा दुसरा उपांत्य सामना 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे मोठे संकट आहे.



हवामानाचा अंदाज


हवामान विभागाने 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत पावसाची 80 टक्क्यांपर्यंत शक्यता वर्तवली आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे, पण याच वेळेत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे क्रिकेट चाहते आणि दोन्ही संघांचे व्यवस्थापन चिंतेत आहे. चांगली गोष्ट म्हणजे, आयसीसीने विश्वचषकाच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवला आहे.


जर 30 ऑक्टोबर रोजी पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे किमान 20-20 षटकांचा सामना (निकाल लागण्यासाठी आवश्यक) पूर्ण होऊ शकला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी हलवला जाईल. राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता, तिथूनच तो पुन्हा सुरू होईल.



सामना पूर्णपणे रद्द झाल्यास काय?


समजा, 30 आणि 31 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी पाऊस पडला आणि सामना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊ शकला नाही (म्हणजेच दोन्ही दिवशी 20-20 षटकांचा खेळ होऊ शकला नाही), तर आयसीसीचा नियम लागू होईल. आयसीसीच्या नियमानुसार, साखळी (लीग) टप्प्यातील गुणतालिकेमध्ये (Points Table) वरच्या स्थानावर असलेल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.


साखळी टप्प्यात, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर होता, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर होता. जर पाऊस दोन्ही दिवस थांबला नाही आणि सामना पूर्णपणे रद्द झाला, तर ऑस्ट्रेलियाचा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर भारतीय संघाचे आव्हान तिथेच संपुष्टात येईल. त्यामुळे, भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा उपांत्य सामना जिंकावाच लागेल.


Comments
Add Comment

IPL 2026 RCB vs CSK : 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून संतापली चेन्नई; केली बीसीसीआयकडे तक्रार

- जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील

Vinod Kambli : मैदानातील हिरो, आयुष्याच्या खेळपट्टीवर हतबल! माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा धोका

आपल्या निर्भीड शैली, आकर्षक रूप आणि क्रिकेटच्या मैदानातील स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा विनोद कांबळी सध्या

Vaishali Rameshbabu : आर. वैशालीचा ऐतिहासिक पराक्रम! ठरली कॅन्डिडेट्स जिंकणारी पहिली भारतीय महिला

मुंबई : भारतीय बुद्धिबळपटू आर. वैशाली (R Vaishali) हिने इतिहास रचत सायप्रसमध्ये झालेली फिडे महिला कॅन्डिडेट्स

IPL 2026 CSK vs KKR : चेन्नईचा चेपॉकवर दबदबा! चेन्नईचा कोलकातावर ३२ धावांनी विजय

मुंबई : आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपली

IPL 2026 SRH vs RR : विदर्भाच्या प्रफुल हिंगेचा कहर; राजस्थानचा विजयरथ रोखण्यात हैद्राबाद यशस्वी

सोमवार १३ एप्रिल रोजी हैद्राबाद आणि राजस्थान (IPL 2026 SRH vs RR) यांच्यात झालेल्या सामन्यात, हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर

Pandya Brothers : पंड्या ब्रदर्समध्ये फूट की संघासाठी एकनिष्ठता ? त्या दिवशी मैदानात नक्की घडल काय?

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर १२ एप्रिल रोजी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा १८