चेहऱ्याची त्वचा नितळ ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!


आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण पदार्थ खाल्ले तर चेहऱ्यावर पुरळ येण्यासारखे प्रकार होतात. मग चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण विविध प्रकारच्या क्रीमस् आणि मेकअपचा चेहऱ्यावर भडिमार करतो. मात्र क्रीमस् आणि मेकअपशिवाय चेहरा तुकतुकीत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.



मेकअपशिवाय
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, दररोज त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये दररोज चेहरा स्वच्छ धुणे, योग्य आहार करणे आणि निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे हे नैसर्गिक तेज मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.




नितळ आणि सुंदर
चेहऱ्यासाठी दररोज किमान तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास त्वचा कोरडी होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते. पाण्यासोबतच योग्य आहार करणे महत्त्वाचे आहे. अती तळलेले पदार्थ, अती आंबट पदार्थ आणि खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीरातील अॅसिडीटी वाढून परिणामी पुरळ येणे, त्वचा लाल होणे असे प्रकार घडतात. तर दुपारच्या जेवणात काकडी, गाजर आणि टोमॅटो सारखे सलाड नियमित खाणे गरजेचे आहे. तसेच दिवसात कमीतकमी आठ तास पूर्ण झोप घेणेसुद्धा गरजेचे आहे. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहतेय.



सर्व प्रकारांप्रमाणेच स्वतंत्र
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनात काही सवयी असणे महत्त्वाचे आहे. ज्यात कोमट किंवा थंड पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुणे अनिवार्य आहे. चेहरा धुतल्यावर स्वच्छ कपड्याने मध्यम कोरडा करावा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे. मॉइश्चराइझरमुळे चेहरा दिवसभर हाइड्रेट राहतो. मॉइश्चराइझरनंतर तिसरी पायरी म्हणजे सुर्यकिरणांपासून बचाव होण्यासाठी सनस्क्रीन लावणे. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा नितळ राहण्यास मदत होईल.


Comments
Add Comment

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

कंगना रणौतला कोर्टाचा दिलासा, वादग्रस्त प्रकरणातून जामीन मंजूर

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिला वादग्रस्त ट्वीट प्रकरणी कोर्टानं दिलासा दिला आहे. देशात