चेहऱ्याची त्वचा नितळ ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!


आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण पदार्थ खाल्ले तर चेहऱ्यावर पुरळ येण्यासारखे प्रकार होतात. मग चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण विविध प्रकारच्या क्रीमस् आणि मेकअपचा चेहऱ्यावर भडिमार करतो. मात्र क्रीमस् आणि मेकअपशिवाय चेहरा तुकतुकीत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.



मेकअपशिवाय
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, दररोज त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये दररोज चेहरा स्वच्छ धुणे, योग्य आहार करणे आणि निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे हे नैसर्गिक तेज मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.




नितळ आणि सुंदर
चेहऱ्यासाठी दररोज किमान तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास त्वचा कोरडी होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते. पाण्यासोबतच योग्य आहार करणे महत्त्वाचे आहे. अती तळलेले पदार्थ, अती आंबट पदार्थ आणि खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीरातील अॅसिडीटी वाढून परिणामी पुरळ येणे, त्वचा लाल होणे असे प्रकार घडतात. तर दुपारच्या जेवणात काकडी, गाजर आणि टोमॅटो सारखे सलाड नियमित खाणे गरजेचे आहे. तसेच दिवसात कमीतकमी आठ तास पूर्ण झोप घेणेसुद्धा गरजेचे आहे. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहतेय.



सर्व प्रकारांप्रमाणेच स्वतंत्र
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनात काही सवयी असणे महत्त्वाचे आहे. ज्यात कोमट किंवा थंड पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुणे अनिवार्य आहे. चेहरा धुतल्यावर स्वच्छ कपड्याने मध्यम कोरडा करावा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे. मॉइश्चराइझरमुळे चेहरा दिवसभर हाइड्रेट राहतो. मॉइश्चराइझरनंतर तिसरी पायरी म्हणजे सुर्यकिरणांपासून बचाव होण्यासाठी सनस्क्रीन लावणे. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा नितळ राहण्यास मदत होईल.


Comments
Add Comment

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

बोईसरकरांच्या प्रतिसादाने पास्थळचे ‘आंबटगोड’ मैदान दुमदुमले

‘दैनिक प्रहार’ पुरस्कृत पास्थळ महोत्सव २०२५ पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट कामामुळे वाहतूक कोंडी वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी

कांदिवली - बोरिवली सहाव्या मार्गामुळे २२ नवीन लोकल फेऱ्या

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवा

वेगवान बहिरी ससाणा नांदूर मधमेश्वर अभयारण्यात!

ताशी २९० किमीचा वेग नाशिक : हवेत अविश्वसनीय वेगाने झेपावणारा, पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान म्हणून ओळखला जाणारा

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार