चेहऱ्याची त्वचा नितळ ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!


आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण पदार्थ खाल्ले तर चेहऱ्यावर पुरळ येण्यासारखे प्रकार होतात. मग चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण विविध प्रकारच्या क्रीमस् आणि मेकअपचा चेहऱ्यावर भडिमार करतो. मात्र क्रीमस् आणि मेकअपशिवाय चेहरा तुकतुकीत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.



मेकअपशिवाय
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, दररोज त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये दररोज चेहरा स्वच्छ धुणे, योग्य आहार करणे आणि निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे हे नैसर्गिक तेज मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.




नितळ आणि सुंदर
चेहऱ्यासाठी दररोज किमान तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास त्वचा कोरडी होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते. पाण्यासोबतच योग्य आहार करणे महत्त्वाचे आहे. अती तळलेले पदार्थ, अती आंबट पदार्थ आणि खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीरातील अॅसिडीटी वाढून परिणामी पुरळ येणे, त्वचा लाल होणे असे प्रकार घडतात. तर दुपारच्या जेवणात काकडी, गाजर आणि टोमॅटो सारखे सलाड नियमित खाणे गरजेचे आहे. तसेच दिवसात कमीतकमी आठ तास पूर्ण झोप घेणेसुद्धा गरजेचे आहे. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहतेय.



सर्व प्रकारांप्रमाणेच स्वतंत्र
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनात काही सवयी असणे महत्त्वाचे आहे. ज्यात कोमट किंवा थंड पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुणे अनिवार्य आहे. चेहरा धुतल्यावर स्वच्छ कपड्याने मध्यम कोरडा करावा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे. मॉइश्चराइझरमुळे चेहरा दिवसभर हाइड्रेट राहतो. मॉइश्चराइझरनंतर तिसरी पायरी म्हणजे सुर्यकिरणांपासून बचाव होण्यासाठी सनस्क्रीन लावणे. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा नितळ राहण्यास मदत होईल.


Comments
Add Comment

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद

Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बंगळूरुत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळूरु येथील स्थानिक

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या